मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा ५० टक्के

जुलैच्या पहिल्याच आठवड्यातील पावसाने साधली किमया


मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलावांमधील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली असून सर्व धरणांमधील पाणी साठा हा ५० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणी पुरवठा करणारी ही सर्व धरणे जुलैच्या पहिल्या महिन्यात भरली गेल्याने पुढील काळात पाऊस लांबला गेला तरी तलावातील पाण्याची पातळी ३१ सप्टेंबरमध्ये वाढ होवून मुंबईकरांना वर्षभर पुरेल इतका पाणी साठा जमा होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


दरवर्षी मुंबईत जुलै अथवा ऑगस्टमध्ये हजेरी लावत असल्यामुळे तलावातील पाणीपातळी घटत जाते आणि यामुळे मुंबईकरांना पाणी पुरवठा करण्यात अडचणी येवून कपात करण्याची वेळ येते.परंतु यंदा पावसाने मे महिन्यातच हजेरी लावल्यानंतर जून महिन्यापासून तलाव क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ होण्यास सुरुवात होऊ लागली. त्यामुळे शुक्रवारी सकाळपर्यंत सर्व धरणांमधील पाण्याच्या पातळीचा अंदाज घेतला असता हा साठा ५० टक्क्यांपर्यंत झाला असल्याचे दिसून आले आहे.गेल्या अनेक वर्षात मे महिन्यात पाऊस व जून मधेच तलाव ५०. ७५ टक्के भरल्याचे घडले नाही. मुंबईला १ ऑक्टोबर पासून वर्षभर पुरेल १४,४७,३६३ दशलक्ष लिटर पाण्याच्या साठ्याची आवश्यकता असते. महापालिकेच्या आजवरच्या इतिहासात सर्व धरणांमधील पाण्याचा साठा ३ जुलैपर्यंत ५० टक्के एवढा जमा होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात आहे.


मुंबईला वर्षभरासाठी सुमारे १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर एवढ्या पाण्याची गरज असते. त्यातुलनेत शुक्रवारी ३ जुलै रोजी ५०.७५ टक्के म्हणजेच ७,३४,५६२ दशलक्ष लिटर पाणी साठा जमा झाला होता. गेल्यावर्षी याच दिवशी ८.५९ टक्के म्हणजे १,२४,३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. तर सन २०२३ मध्ये याच दिवशी १७.६६ टक्के म्हणजे २,५५,६२२ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला होता. गुरुवारी सकाळी ६ ते शुक्रवारी सकाळी ६ वाजता संपलेल्या २४ तासात अप्पर वैतरणा धरणात तलावात ३८ मि.मी,मोडक सागर धरणांत ७८ मि.मी, तानसा तलावात ५६ मि.मी, मध्य वैतरणा तलावात ७० मि.मी,भातसा धरणांत ६२ मि.मी, विहार तलावात २६ मि.मी, आणि तुळशी तलावात ५४ मि.मी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. सध्या तलाव आणि धरणांमधील पाणी साठा हा येत्या १ जानेवारी २०२६ पर्यंत पुरेल इतका आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर सिया गोयलच्या कुटुंबाला आणखी एक धक्का; वडिलांच्या दुकानावर 'FDA'ची कारवाई

मुंबई : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Murder Case) आरोपी सिया गोयल हिच्या कुटुंबाशी संबंधित व्यवसायावर अन्न व औषध

BMC News : कोविड काळातील ऑक्सिजन प्लांटची यंत्रणा गेली कुठे? , स्थायी समिती सदस्यांचा प्रशासनाचा सवाल

माहिती सादर करण्याचे अध्यक्षांचे निर्देश मुंबई : कोविड काळामध्ये मुंबई महापालिकेच्या वतीने अनेक ठिकाणी

Malaria and Dengue : मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे थैमान, मलेरिया ३,६८१, डेंग्यू ९३८, लप्टोच्या १५७ रुग्णांची नोंद!

एडिस व अनोफिलीस डासांच्या २७ हजारांहून अधिक आळ्या सापडल्या ३६ लाख ८१ हजार लोकांचा सर्वे, १० लाखांहून अधिक