भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आधी ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार असलेली स्पर्धा आता सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करुन स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करतील. यानंतर ते जाहीर केले जाईल.

बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्था

बांगलादेशमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात पुढील वर्षीपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले होत आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचा क्रिकेट दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.
Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत

All England Open : लक्ष्य सेनची दमदार आगेकूच, उपांत्यपूर्व फेरीत धडक

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर लक्ष्य सेनची शानदार कामगिरी सुरूच आहे. पहिल्या फेरीत माजी जागतिक

रविवारी मोदी स्टेडियमवर भारत - न्यूझीलंड फायनल रंगणार, सेमी फायनलमध्ये भारताचा विजय

मुंबई : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चौकार-षटकारांचा पाऊस पडला. भारताच्या २५३ धावांना इंग्लंडकडूनही सडेतोड