भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

  54

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आधी ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार असलेली स्पर्धा आता सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करुन स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करतील. यानंतर ते जाहीर केले जाईल.

बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्था

बांगलादेशमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात पुढील वर्षीपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले होत आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचा क्रिकेट दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.
Comments
Add Comment

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र

नाईट वॉचमन आकाशदीपने इंग्लंडची झोप उडवली

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना केनिंग्टन ओव्हल