भारत - बांगलादेश क्रिकेट मालिका होणार की नाही होणार ? अखेर उत्तर मिळाले

मुंबई : भारत आणि बांगलादेश या दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघांमध्ये ऑगस्ट २०२५ मध्ये तीन एकदिवसीय सामने आणि दोन टी २० सामने होणार होते. पण हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. आधी ऑगस्ट २०२५ मध्ये सुरू होणार असलेली स्पर्धा आता सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांचे क्रिकेट बोर्ड नव्याने चर्चा करुन स्पर्धेचे सुधारित वेळापत्रक निश्चित करतील. यानंतर ते जाहीर केले जाईल.

बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्था

बांगलादेशमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात पुढील वर्षीपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले होत आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचा क्रिकेट दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.
Comments
Add Comment

WC Semi-Final: पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहोचली दक्षिण आफ्रिका, इंग्लंडला १२५ धावांनी हरवले

मुंबई : आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला टी२० सामना पावसामुळे रद्द : दुसरा सामना ३१ ऑक्टोबरला!

ऑस्ट्रेलिया : मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाणारा पहिला टी२० सामना अखेर सततच्या

टी२० मध्ये पुन्हा पावसाचे विघ्न: २० ऐवजी १८ षटकांचा सामना !

कॅनबेरा : कॅनबेरातील मनुका ओव्हल स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत–ऑस्ट्रेलिया पहिल्या टी२० सामन्यात पुन्हा एकदा

भारताला मोठा धक्का: दुखापतीमुळे नितीश कुमार रेड्डी तीन T20 सामन्यांमधून बाहेर!

कॅनबेरा : भारतीय क्रिकेट संघासाठी धोक्याची घंटा वाजवणारी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने बुधवारी दिलेल्या

७ महिन्यांच्या गर्भवती सोनिकाने जिंकले वेटलिफ्टिंग स्पर्धेत कांस्य पदक

दिल्ली : आयुष्यात काहीही अशक्य नाही, फक्त जिद्द असायला हवी. दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल सोनिका यादव यांनी हे खरे

वन डे रँकिंगमध्ये स्मृती मानधनाचे वर्चस्व कायम

मुंबई : आयसीसी महिला एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेत भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिने चमकदार कामगिरी केली