बांगलादेशमधील कायदा सुव्यवस्था
बांगलादेशमध्ये सध्या लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार अस्तित्वात नाही. बांगलादेश सरकारचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी देशात पुढील वर्षीपर्यंत निवडणूक घेणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. मागील काही महिन्यांपासून बांगलादेशमध्ये सातत्याने अल्पसंख्यांक हिंदू समाजावर हल्ले होत आहेत. हिंदू आणि इतर अल्पसंख्यांकांवरील अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने बांगलादेश विरुद्धचा क्रिकेट दौरा सप्टेंबर २०२६ पर्यंत पुढे ढकलत असल्याचे जाहीर केले. खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे करत बीसीसीआयने दौरा पुढे ढकलला आहे.