मुंबईत आता दर १०० मीटर अंतरावर बसवल्या जाणार कचरापेट्या

मुंबई : मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागांसाठी कचरा उचलण्यासाठी मोठ्या आणि छोट्या कॉम्पॅक्टरसह मनुष्यबळाची सेवा खासगी संस्थेमार्फत घेतली जाणार आहे. या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रती १०० मीटर अंतरावर छोट्या आकाराच्या कचरा पेट्या बसवल्या जाणार आहेत. आजवर अशाप्रकारच्या लटकत्या कचरापेट्या बसवल्या गेल्या असल्या तरी त्याची योग्यप्रकारे स्वच्छता आणि देखभाल तसेच त्यातील कचरा उचलला न गेल्याने या कचरा पेट्या अस्वच्छ दिसून येत होत्या; परंतु आता नव्याने आकर्षक स्वरुपात तब्बल २३ हजार कचरापेट्या बसवल्या जाणार असून त्यांची दैनंदिन स्वच्छता आणि देखभालही संबंधित संस्थेकडून केली जाणार आहे.


पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने सध्या कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेकडून पुरवल्या जाणाऱ्या कॉम्पॅक्टर सेवेचे कंत्राट संपुष्टात येत असल्याने आता नव्याने २१ विभागांमध्ये मनुष्यबळासह कचरा गाड्या पुरवण्यासाठी कंत्राट कामांसाठी निविदा निमंत्रित केली आहे. या नव्याने कंत्राट कामांमध्ये ७ टनाच्या कॉम्पॅक्टर असतील आणि यामध्ये निव्वळ कचरा असेल तसेच सुका कचरा आणि घातक कचऱ्यासाठी स्वतंत्र वाहने असतील. मात्र, या कंत्राट कामांमध्ये रस्त्याच्या कडेला १०० मीटर अंतरावर थुंकण्यासाठी तसेच किरकोळ कचरा टाकण्यासाठी आकर्षक कचरापेट्या बसवल्या जाणार आहेत.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर