आषाढी वारीत भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश!

पंढरपूरच्या आषाढी वारीत सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेचा अनोखा संगम


पंढरपूर: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आहे. लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या पवित्र भूमीत पायी चालत येतात. या पवित्र यात्रेत भक्तीचा गजर आणि विठ्ठलनामाचा जप तर आहेच, पण यंदा सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने या वारीला एक नवे परिमाण जोडले आहे.


सुमित ग्रुपच्या हजारो स्वयंसेवकांनी आषाढी वारी आणि परतवारीच्या मार्गावर स्वच्छतेचा संदेश देत, परिसराला निर्मळ आणि पवित्र ठेवण्याचा संकल्प पूर्ण केला.या स्वच्छता मोहिमेची संकल्पना आणि दिग्दर्शन सुमित पाटील यांनी केले असून, पराग सावंत, राहुल पारकर आणि चिन्मय परब यांनी या कार्याचे छायाचित्रण, निखिल पालंडे यांचे लेखन, सौरभ नाईक यांचे संकलन, रविराज कोलथरकर यांनी संगीत तर अभिनेते उदय सबनीस यांचा आवाज असून या अनोख्या उपक्रमाला चित्ररूप दिले आहे.




सुमित ग्रुपच्या स्वयंसेवकांनी वारीच्या मार्गावर आणि पंढरपूर परिसरात अथक परिश्रम करत रस्ते स्वच्छ केले. या मोहिमेचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये स्वच्छतेच्या दूतांनी भक्ती आणि कर्तव्याचा संगम कसा घडवला, याचे सुंदर दर्शन घडते.


वारीदरम्यान चंद्रभागेच्या काठावर लाखो भाविकांचा मेळा जमतो. विठ्ठलाच्या दर्शनाने मन प्रसन्न होते, पण परिसरातील अस्वच्छता अनेकांना खटकते. याच आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सुमित ग्रुपचे स्वयंसेवक 'माऊलीच्या लेकरां'प्रमाणे कार्यरत झाले. त्यांनी निस्वार्थ भावनेने स्वच्छतेचे कर्तव्य निभावले आणि परतवारीच्या पावित्र्याला जपले. या स्वयंसेवकांचे कार्य पाहून अनेक वारकऱ्यांच्या मनात स्वच्छतेच्या प्रति जागरूकता निर्माण झाली. विठ्ठल माऊली केवळ विटेवर नाही, तर या स्वच्छता दूतांच्या रूपात भक्तांमध्ये वावरत असल्याची अनुभूती अनेकांना झाली.या मोहिमेच्या माध्यमातून सुमित ग्रुपने केवळ परिसर स्वच्छ केला नाही, तर भक्तीच्या प्रवाहात स्वच्छतेचे धागे विणले.



"वारी ही केवळ भक्तीचा उत्सव नाही, तर कर्तव्य आणि जबाबदारीचा संगम आहे," असे सुमित पाटील यांनी सांगितले. श्रीरंग ट्रस्टने या मोहिमेच्या प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यात टिपत, स्वच्छतेच्या या संदेशाला व्यापक स्वरूप दिले.आषाढी वारीच्या या पवित्र प्रवासात सुमित ग्रुपच्या स्वच्छता मोहिमेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. विठ्ठलाच्या भक्तीचा गजर आणि स्वच्छतेचा संदेश यांचा हा संगम प्रत्येक वारकऱ्याच्या मनात कायमचा कोरला गेला आहे.

Comments
Add Comment

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला

पुण्यातील दर्ग्याखाली बोगदा! हिंदू संघटनांनी केला मंदिर असल्याचा दावा

पुणे: पुण्यातील मंचर येथील दर्ग्याच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळली, त्याखाली मंदिरासारखी रचना आढळल्याने वाद