पहिलीच्या वेळापत्रकातून ‘हिंदी’ हद्दपार

मुंबई: पहिल्या इयत्तेपासून हिंदी ही तिसरी भाषा म्हणून अनिवार्य करण्यासाठी झालेल्या विरोधानंतर राज्य सरकारने तिसर्‍या भाषेचा जीआर रद्द केला आहे. त्याचप्रमाणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) नव्या वेळापत्रकातूनही तिसरी भाषा हद्दपार झाली आहे.  त्यामुळे आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये फक्त दोनच भाषा शिकवल्या जाणार असून तिसऱ्या भाषेची सक्ती असणार नाही. त्याबरोबरच तिसऱ्या भाषेच्या समावेशानंतर कमी केलेला कला, क्रीडा आणि कार्यानुभवाचा वेळ वाढवण्यात आला असून शाळांनी लवकरात लवकर विषयनिहाय तासिका विभागणीच्या आधारे वेळापत्रक तयार करावे, असे सुचवण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे ८ मार्च २०२४ च्या शासन आदेशानुसार सक्तीचे झाले आहे. राज्यातील सर्व शाळांत यासंबंधीचा आदेश अंमलात आला आहे. हिंदी सक्तीची करण्याचा आदेश रद्द करणारा जीआर गुरुवारी काढला गेला.

तिसर्‍या भाषेच्या सक्तीवरून राज्यातून आलेला विरोध लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसर्‍या भाषेसंदर्भातील सर्व शासन निर्णय रद्द केला आहे. इयत्ता पहिली व दुसरीसाठी विषयनिहाय वेळेचे नियोजन केले आहे. या नियोजनानुसार तासिकांमधून तिसरी भाषा संपूर्णपणे वगळण्यात आली आहे. या तिसर्‍या भाषेच्या आठवड्यातील पाच तासिकांसाठी वर्ग केलेला आठवड्यातील २ तास ५५ मिनिटांची वेळ प्रथम भाषा, कला, क्रीडा आणि कार्यानुभव या विषयांच्या तासिकांमध्ये वाढवण्यात आली आहे.

आधीच्या वेळापत्रकात पहिल्या भाषेसाठी संपूर्ण आठवडाभरात ३५ मिनिटांच्या १५ तासिका होत्या. त्यात एका तासिकेची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय कला व हस्तकला विषयासाठी पूर्वीच्या ४ तासिकांऐवजी ३५ मिनिटांच्या ६ तासिका ठेवत ७० मिनिटे वाढवण्यात आली आहेत. क्रीडा आणि कार्यानुभव या दोन्ही विषयांसाठी पूर्वी ३५ मिनिटांच्या २ तासिका होत्या. आता त्यात एकेक तासिका वाढवण्यात आली आहे.३५ मिनिटांच्या ३ तासिकांमध्ये उपचारात्मक अध्यापन, स्पर्धा परीक्षा तयारी, सराव असे उपक्रम घेता येणार आहेत. या तासिका कोणत्या विषयांसाठी वापरायच्या, याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यात आले आहे.

 
Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे