एकाच महिन्यात ९ लाख लाडक्या बहिणींचा प्रवास

विरार (प्रतिनिधी) : महापालिकेच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद वसई-विरार महापालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लाडक्या बहिणींना चांगलीच पसंत आली. पहिल्याच महिन्यात ९ लाख १५ हजार १७५ लाडक्या बहिणींनी या परिवहन सेवेचा लाभघेतला असून, सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळत असल्यामुळे महिलांनी महापालिका प्रशासना प्रती समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमाच्या पहिल्या दिवशी १८,८५६ लाडक्या बहिणींच्या प्रवासाचा आकडा १० जूननंतर वाढला, ३० जून पर्यंत ३७ हजार होता.


वसई-विरार महानगरपालिकेने १ जूनपासून महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत महिलांना तिकीट दरामध्ये ५० टक्के सवलत दिली. महापालिका क्षेत्रातील वेगवेगळ्या ३७मार्गावर १५४ बसच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात आहे. वसई विरार महापालिकेच्या क्षेत्रांमध्ये आता महिला प्रवाशांना १० रुपये ऐवजी ५ रुपये आणि १५ रुपयां ऐवजी ८रुपये देऊन शहरात प्रवास होत असल्याने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना १ जून म्हणजेच रविवारपासून प्रारंभ करण्यात आली. रविवार असल्याने पहिल्या दिवशी महिला प्रवाशांची संख्या कमी दिसून आली. पहिल्या दिवशी १८ हजार ८५६ महिलांनी मनपाच्या परिवहन सेवेचा लाभ घेतला. महिला प्रवाशांचा आकडा वाढत गेला. २ जून रोजी २५ हजार ११२, असलेली महिला प्रवाशांची संख्या पाचव्या दिवशी ३० हजार ३९२ वर पोहचली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुद्धा या योजनेचा प्रचार करण्यात आला.


त्यामुळे महिला प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. १० जून पासून ३० जून पर्यंत रविवार वगळता महिला प्रवाशांची संख्या ही ३० हजारावर ते ३७ हजाराहून अधिक अशीच राहिली. महिला प्रवाशांना सवलत मिळत असल्याने या बससेवेचा लाभमहिला प्रवाशांकडून मोठ्या प्रमाणात घेतलाजात आहे.


वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रात राहणाऱ्या आमच्या लाडक्या बहिणींना प्रवासात थोडा का होईना पण आर्थिक दिलासा मिळावा म्हणून महापालिकेकडे या उपक्रमाबाबत पाठपुरावा केला. महिला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता, समाधान वाटत असून, भविष्यात महिलांच्या हितासाठी योजना राबविण्यावर भर राहील. स्नेहा दुबे पंडित, आमदार वसई

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे