‘जय गुजरात’: पवारांचा दाखला देत फडणवीसांकडून शिंदेंची पाठराखण!

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 'जय गुजरात' या घोषणेमुळे तापले आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या जुन्या उदाहरणाचा दाखला देत शिंदे यांची पाठराखण केली आहे.


मुंबईत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' म्हटले म्हणजे त्यांचे गुजरातवर प्रेम असून महाराष्ट्रावर प्रेम नाही असे समजणे चुकीचे आहे. त्यांनी शरद पवार यांचे उदाहरण देत सांगितले की पवार साहेबांनी देखील एकदा कर्नाटकच्या लोकांमध्ये अशीच घोषणा दिली होती. त्यामुळे इतका संकुचित विचार कुणी करत असेल तर ते चुकीचे आहे आणि आता विरोधकांकडे मुद्दे नाहीत, असे म्हणत त्यांनी विरोधकांना सुनावले.



गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरून वाद सुरू होता. ठाकरे बंधूंनी मोर्चाचे आयोजन केल्यानंतर सरकारने हा निर्णय मागे घेतला होता. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात गुजरातचा जयजयकार केला. यावेळी त्यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात' असे म्हटले होते.


एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात'चा नारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठवण करून दिली की यापूर्वी एकदा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे उद्घाटन करताना शरद पवार साहेब 'जय महाराष्ट्र, जय कर्नाटक' म्हणाले होते. फडणवीस यांनी प्रश्न विचारला की याचा अर्थ पवार साहेबांचे कर्नाटकावर जास्त प्रेम आहे आणि महाराष्ट्रावर कमी प्रेम आहे असे समजायचे का?


फडणवीस यांनी स्पष्ट केले की, आपण ज्यांच्या कार्यक्रमात जातो त्यावेळी त्या संदर्भात आपण बोलत असतो. गुजराती समाजाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर 'जय गुजरात' म्हटले याचा अर्थ एकनाथ शिंदेंचे गुजरातवर जास्त प्रेम आहे आणि मराठीवर कमी झाले असे नाही. इतका संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही असे त्यांनी नमूद केले.


मराठी माणूस वैश्विक आहे असे सांगत फडणवीस यांनी याच मराठी माणसाने अटकेपार झेंडा नेला आहे आणि भारताला स्वतंत्र केले आहे याचा उल्लेख केला. मुघल सत्ता घालवण्याचे आणि दिल्लीवर भगवा झेंडा रोवण्याचे काम मराठी माणसाने केले आहे. त्यामुळे एवढा संकुचित विचार कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Comments
Add Comment

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या

Seeds Act : राज्याचा स्वतंत्र बियाणे कायदा करणार

मुंबई : शेतकऱ्यांना स्वतःचे बियाणे साठवणे, वापरणे, देवाणघेवाण करणे आणि (ब्रँडेड नाव न वापरता) विक्री करण्यास