IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

  27

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कोणत्याही दबावापोटी राजीनामा दिलेला नाही. स्वच्छेने राजीनामा देत आहे, असे सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले.

सिद्धार्थ कौशल हे २०१२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. सिद्धार्थ कौशल २०१२ मध्ये आयपीएस झाले आणि त्यानंतर त्यांनी कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि अलिकडेच आंध्र प्रदेशात महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून जबाबदाऱ्या हाताळल्या.

भारतीय पोलीस सेवेचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणास्तव आणि पूर्ण विचार केल्यानंतर घेतला आहे. माझ्या जीवनातील ध्येय आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे; असे सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले राजीनाम्याचा कोणत्याही दबावाशी किंवा छळाशी संबंध नाही; असेही सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले. भारतीय पोलीस दलात सेवा करणे हा आयुष्यातील सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध करणारा प्रवास होता, असेही सिद्धार्थ कौशल म्हणाले.
Comments
Add Comment

२५ जुलैपासून रेल्वेची रामायण यात्रा पर्यटन ट्रेन सुरू

मुंबई: भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या यात्रेकरूंसाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड

अ‍ॅपलच्या योजनेला ब्रेक; ३०० चिनी अभियंते भारतातून माघारी

मुंबई : भारताची जागतिक उत्पादन केंद्र होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या अ‍ॅपलच्या 'आयफोन १७' प्रकल्पाला

भारतीय सैन्याला मिळणार १.०३ लाख कोटी रुपयांची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे आणि वाहने

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेने १.०३ लाख कोटी रुपयांची शस्त्रे आणि लष्करी उपकरणे खरेदी

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे

ब्रिटिश रॉयल नेव्हीचे बंद पडलेले F35 B लढाऊ विमान, भारतातून तुकडे करुन परत पाठवणार

केरळमध्ये अडकलेल्या लढाऊ विमानाची अखेर दुरुस्ती झालीच नाही, शेवटी तुकड्यांमध्ये ब्रिटनला

बेदरकार गाडी चालवणाऱ्यांना विमा भरपाई नाही - सर्वोच्च न्यायालय

स्वतःच्या चुकीमुळे झालेल्या अपघातात मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना भरपाई मिळणार नाही नवी दिल्ली : भारताच्या