IPS सिद्धार्थ कौशल यांचा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय पोलीस सेवेत (IPS / Indian Police Services) १३ वर्ष सेवा केल्यानंतर आंध्र प्रदेशमधील आयपीएस अधिकारी सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. कोणत्याही दबावापोटी राजीनामा दिलेला नाही. स्वच्छेने राजीनामा देत आहे, असे सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले.

सिद्धार्थ कौशल हे २०१२ मध्ये भारतीय पोलीस सेवेत दाखल झाले. त्यांनी महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) पदापर्यंतच्या जबाबदाऱ्या हाताळल्या आहेत. सिद्धार्थ कौशल २०१२ मध्ये आयपीएस झाले आणि त्यानंतर त्यांनी कृष्णा आणि प्रकाशम जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक आणि अलिकडेच आंध्र प्रदेशात महानिरीक्षक (कायदा आणि सुव्यवस्था) म्हणून जबाबदाऱ्या हाताळल्या.

भारतीय पोलीस सेवेचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे. हा निर्णय पूर्णपणे वैयक्तिक कारणास्तव आणि पूर्ण विचार केल्यानंतर घेतला आहे. माझ्या जीवनातील ध्येय आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेनुसार मी हा निर्णय घेतला आहे; असे सिद्धार्थ कौशल यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले राजीनाम्याचा कोणत्याही दबावाशी किंवा छळाशी संबंध नाही; असेही सिद्धार्थ कौशल यांनी सांगितले. भारतीय पोलीस दलात सेवा करणे हा आयुष्यातील सर्वात परिपूर्ण आणि समृद्ध करणारा प्रवास होता, असेही सिद्धार्थ कौशल म्हणाले.
Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी