IND vs ENG Test 2: तिसऱ्या दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी

एजबेस्टन: भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅमच्या एजबेस्टनमध्ये दुसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा तिसरा दिवस आहे. इंग्लंडचा पहिला डाव ४०७ धावांवर आटोपला. सिराजने ६ विकेट मिळवल्या तर आकाशदीपला ४ विकेट मिळवता आल्या. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून दिवसअखेर भारताकडे २४४ धावांची आघाडी आहे.


भारताने तिसऱ्या दिवशी दुसऱ्या डावात १ बाद ६४ धावा केल्या आहेत. सलामीवीर यशस्वी जायसवाल २८ धावा करून बाद झाला. तर केएल राहुल २८ आणि करूण नायर ७ धावांवर खेळत आहे.


याआधी मोहम्मद सिराजने तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार केली. आपल्या खात्यात पहिल्याच षटकांत त्याने ज्यो रूट आणि कर्णधार बेन स्टोक्सला बाद केले. दरम्यान, त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. यानंतर स्मिथ आणि ब्रूकने कमालीची फलंदाजी केली. दोघांमध्ये ३००हून अधिक धावांची भागीदारी झाली. मात्र ब्रूक बाद होताच इंग्लंडचा डाव कोसळला.


याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर ५८७ धावा केल्या होत्या. इंग्लंड १८० धावांनी पिछाडीवर आहे.



असा होता इंग्लंडचा डाव


इंग्लंड संघाची पहिल्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. १३ धावांवर त्यांना सलग दोन धक्के बसले. आकाशदीपने गेल्या सामन्यातील शतकवीर बेन डकेट आणि ओली पोप यांना शून्यावर बाद केले. तर जॅक क्राऊलीही काही खास करू शकला नाही. त्याने १९ धावा केल्या आणि तो सिराजच्या हाती बाद झाला. तिसऱ्या दिवसाची सुरूवात धमाकेदार झाली. सिराजने पहिल्याच षटकात जो रूट आणि बेन स्टोक्स यांना माघारी धाडले. स्टोक्सला खातेही खोलता आले नाही. रूटने २२ धावा केल्या होत्या.

Comments
Add Comment

राष्ट्रध्वजाचा अपमान टाळण्यासाठी विराट कोहलीने केलेल्या कृतीचे अनेकांनी केले कौतुक

सिडनी : रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या जबरदस्त बॅटिंग भारतानं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात

ऑस्ट्रेलियात पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताला ११ पदके

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल २०२५ मध्ये भारतीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडूंनी शानदार कामगिरी करत

उपांत्य फेरीत भारतीय संघ खेळणार 'या' संघाविरूद्ध!

मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचला असून उपांत्य फेरीची उत्सुकता क्रिकेट

'रो-को'ने ऑस्ट्रेलियाचा विजयरथ रोखला, रोहितचे शतक आणि विराटचे अर्धशतक; 'रो-को'ची ऐतिहासिक कामगिरी

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सिडनीच्या मैदानावर रंगलेला एकदिवसीय सामना भारताने नऊ गडी राखून जिंकला.

“विकसित भारत चॅलेंज ट्रॅक” मुंबईत युवा महोत्सव २७ ऑक्टोबरला

मुंबई : युवकांचा सर्वांगीण विकास, भारतीय संस्कृती आणि परंपरेचे जतन, सुप्त गुणांना प्रोत्साहन तसेच राष्ट्रीय

तिसऱ्या युथ आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण

मुंबई : बहरीनमधील मनामा येथे आशियाई युवा क्रीडा स्पर्धा २०२५ मध्ये भारताने कबड्डीमध्ये पूर्ण विजय मिळवत सुवर्ण