हिमाचल प्रदेश : नैसर्गिक आपत्तीमुळे ६३ जणांचा मृत्यू, ४० बेपत्ता

राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पुरामुळे भीषण परिस्थिती


शिमला : हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यात भूस्खलन, ढगफुटी आणि पूरामुळे आतापर्यंत किमान ६३ जणांचा मृत्यू झाला असून, ४० हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


राज्यात ७ जुलैपर्यंत सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. सर्वात जास्त नुकसान मंडी जिल्ह्यात झाले असून, येथील थुनाग, बगस्याड, करसोग आणि धरमपूर या भागांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.हिमाचल प्रदेशच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे विशेष सचिव डी. सी. राणा यांनी सांगितले की, आत्तापर्यंत सुमारे 400 कोटी रुपयांचे नुकसान नोंदवले गेले आहे. प्रत्यक्ष नुकसान यापेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. सध्या आमचा प्राथमिक भर बचाव, शोध आणि पुनर्संचयना यावर असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यात मंडी जिल्ह्यात सर्वाधिक 17 मृत्यू झाले असून कांगडा येथे 13, चंबामध्ये 6 आणि शिमला येथे 5 जण मृत्यूमुखी पडलेत. या व्यतिरिक्त बिलासपूर, हमीरपूर, किन्नौर, कुल्लू, लाहौल-स्पीती, सिरमौर, सोलन आणि ऊना जिल्ह्यांतूनही मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यासोबतच राज्यात 100 हून अधिक जण जखमी झाले असून शेकडो घरे उध्वस्त झाली आहेत. तसेच 14 पूल वाहून गेले असून 500 हून अधिक रस्ते बंद आहेत. त्याचप्रमाणे 500 पेक्षा जास्त वीज ट्रान्सफॉर्मर्स बंद असून अनेक भागात अंधार आहे. सुमारे 300 जनावरांचा मृत्यू झाला असून पिण्याचे पाणी आणि अन्नाचा तुटवडा आहे.


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचलसह गुजरात, राजस्थान, उत्तराखंड आणि छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून एनडीआरएफ पथकांची तैनाती केली आहे. आवश्यकतेनुसार अधिक पथके पाठवली जातील, असे आश्वासन दिले आहे. “केंद्र सरकारकडून शक्य ती सर्व मदत दिली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्य सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनांकडून शोध आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असून, हवामान खात्याने आणखी पावसाचा इशारा दिल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

India : भारत रशियाकडून तेलखरेदी सुरू ठेवणार

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून अमेरिकेने रशियन तेल खरेदीवर भारतावर निर्बंध लादले होते भारतावरील हे

Navapur : नवापूर एमआयडीसीत वनविभागाचा मोठा दणका; बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!

नवापूर : नवापूर एमआयडीसी (MIDC) परिसरात बिबट्या या संरक्षित वन्यप्राण्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या टोळीचा

Women’s Reservation Bill : महिला आरक्षणामुळे दक्षिणी राज्यांचे कोणतेही नुकसान नाही - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दक्षिण भारतातील

Akasa Air and SpiceJet aircraft collide : दिल्ली विमानतळावर अकासा एअर आणि स्पाईसजेटच्या विमानाची टक्कर

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळावर अकासा एअरचे विमान VT-YBA आणि स्पाईसजेटचे विमान VT-SLB यांची टक्कर झाली. फ्लाइटराडार24 च्या

Women’s Reservation Bill : काय आहे 'नारी शक्ती वंदन' कायदा ? जाणून घ्या महिला आरक्षणाचे संपूर्ण स्वरूप आणि फायदे

तीन प्रमुख घटनादुरुस्ती विधेयके सादर नवी दिल्ली : आज, १६ एप्रिल २०२६ रोजी, केंद्र सरकारने महिला आरक्षणाच्या

Nari Shakti Vandan : ही मोदींची गॅरंटी... महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींचे विरोधकांना भर सभागृहात खडेबोल

नवी दिल्ली : सध्या संसदेच्या विशेष अधिवेशनात 'नारी शक्ती वंदन अधिनियमा'वर (महिला आरक्षण विधेयक) ऐतिहासिक चर्चा