'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला

नवी दिल्ली : 'ऑपरेशन सिंदूर'च्या निमित्ताने भारत तीन देशांशी लढला. पाकिस्तानचे सैन्य तसेच चीन आणि तुर्कीयेच्या तंत्रज्ञानाचा आणि त्यांच्या विविध उपकरणांचाही भारताने यशस्वी मुकाबला केला. ही माहिती भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह यांनी दिली. ते नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. चीन हेरगिरी करुन भारताविषयी मिळवलेली माहिती पाकिस्तानला पुरवतो. पण ही माहिती मिळूनही पाकिस्तानला त्याचा फायदा घेणे जमलेल नाही, असेही उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले.



मागील पाच वर्षात पाकिस्तानने जी शस्त्रे खरेदी केली त्यात ८१ टक्के चिनी शस्त्रे होती. यामुळे भारत ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने पाकिस्तानच्या सैनिकांशी तसेच चीन आणि तुर्कीयेच्या तंत्रज्ञान आणि उपकरणांशी लढला. सुरवातला ऑपरेशन सिंदूर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांचे तळ नष्ट करण्यापुरते होते. पण पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला आणि भारताला कारवाईचा थोडा विस्तार करावा लागला. पण भारताने वेगाने आणि प्रभावीरित्या उत्तर दिले. यामुळे ऑपरेशन सिंदूर मर्यादीत काळात मोठे यश मिळवू शकल्याचे भारताचे उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल राहुल सिंह म्हणाले.

भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात चीन आणि तुर्कीये यांनी त्यांच्या तंत्रज्ञानाची चाचणी घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या निमित्ताने चीन आणि तुर्कीये यांनी पाकिस्तानचा वापर युद्ध साहित्याच्या चाचणीची प्रयोगशाळा म्हणून केला.

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे २६ नागरिकांची हत्या केली. मृतांमध्ये परदेशी नागरिकही होता. यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर केले. भारताने पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांच्या नऊ तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले.
Comments
Add Comment

Char Dham Yatra : चार धाम यात्रा तात्पुरत्या स्थगितीनंतर पुन्हा सुरू

नवी दिल्ली : यात्रेच्या मार्गांचा सखोल आढावा घेतल्यानंतर, २० जुलै रोजी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरती स्थगित

NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा

Urea Production : युरिया उत्पादनात देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल, खासदार अशोक चव्हाणांच्या प्रश्नाला केंद्राचे उत्तर

नवी दिल्ली : शेती आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या युरिया उत्पादनाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे.

Russian Missile Attack : रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ४ भारतीय खलाशांचा मृत्यू; भारताचा संताप, रशियन राजदूतांना समन्स

नवी दिल्ली : युक्रेनच्या किनारपट्टीजवळील व्यापारी मालवाहू जहाजावर झालेल्या रशियन हल्ल्यात चार भारतीय खलाशांचा

Kangana Ranaut On CJP : 'आम्ही संसदेत कैदेत असल्यासारखे अडकलो होतो'; दिल्लीतील हिंसक आंदोलनावर खासदार कंगना रनौत यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : सोमवारी सकाळी दिल्लीच्या मध्यभागी हजारो आंदोलकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा वळवला. हा मोर्चा

IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत