दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर  


नवी दिल्ली: दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीनने अडथळे निर्माण करण्याचा पवित्रा घेतला आहे. तिबेटी बौद्ध धार्मिक नेते, १४ वे दलाई लामा यांनी जेव्हापासून पुढील दलाई लामाची घोषणा त्यांच्या हयातीतही होऊ शकते अशी घोषणा केली तेव्हापासून चीन अस्वस्थ झाला आहे.  दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागेल, असा चीन आग्रह धरत आहे. ज्यावर आता भारत सरकारनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Dispute over Dalai Lama's succession)

भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, उत्तराधिकारी निवडीचा निर्णय केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेनुसारच घेतला जाईल. कोणत्याही तृतीय पक्षाला, मग तो देश असो वा संस्था, या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

दलाई लामाच्या उत्तराधिकारावरून वाद 


६ जुलै रोजी तिबेटी बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा ९० वर्षांचे होतील, त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावरून सुरू असलेला वाद हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये चीन हस्तक्षेप करू लागला आहे.  दलाई लामा यांच्या भावी उत्तराधिकारी घोषणेसाठी चीनची मान्यता असायला हवी, असे म्हणत चीन नाक खुपसू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नावर टीका केली आहे. 

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नाही


किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की "दलाई लामा यांचे पद सर्वात महत्वाचे आहे. हे पद केवळ तिबेटी लोकांसाठीच नाही तर सर्व बौद्ध उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. दलाई लामांव्यतिरिक्त इतर कोणालाही दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार नाही. दलाई लामांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यातही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकृत हक्क त्यांच्या 'गाडेन फोडरंग ट्रस्ट'कडेच आहे. चीनने मांडलेल्या उत्तराधिकारी मान्यतेच्या दाव्याला पूर्णपणे फेटाळत त्यांनी ही भूमिका मांडली. चीनकडून करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन करताना भारताने पुन्हा एकदा तिबेटी बौद्ध परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. "कोणताही देश अगदी चीनसुद्धा दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवू शकत नाही," असे ठाम मत रिजिजू यांनी व्यक्त केले. देशभरातील बौद्ध अनुयायी दलाई लामांच्या शिकवणी आणि धार्मिक परंपरांचे आजही निष्ठेने पालन करतात, असेही रिजिजू यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार दलाई लामांचा वाढदिवस 


दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस येत्या ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा होणार असून, भारत सरकारकडून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंग या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  ही भूमिका भारताने तिबेटी बौद्ध धर्मगुरूंच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर घेतलेली स्पष्ट केली आहे.
Comments
Add Comment

India Weather : मुसळधार पाऊस थांबायचं नाव घेईना! देशातील 17 राज्यांना हाय अलर्टचा इशारा; आसाममधील पूरस्थिती गंभीर

मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक