दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार केवळ तिबेटी परंपरेलाच: किरेन रिजिजू

तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीबाबत चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर  


नवी दिल्ली: दलाई लामा यांच्या उत्तराधिकारी निवडीत चीनने अडथळे निर्माण करण्याचा पवित्रा घेतला आहे. तिबेटी बौद्ध धार्मिक नेते, १४ वे दलाई लामा यांनी जेव्हापासून पुढील दलाई लामाची घोषणा त्यांच्या हयातीतही होऊ शकते अशी घोषणा केली तेव्हापासून चीन अस्वस्थ झाला आहे.  दलाई लामा यांच्या उत्तराधिकारीसाठी चीनची मान्यता घ्यावी लागेल, असा चीन आग्रह धरत आहे. ज्यावर आता भारत सरकारनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Dispute over Dalai Lama's succession)

भारताने ठामपणे स्पष्ट केले आहे की, उत्तराधिकारी निवडीचा निर्णय केवळ दलाई लामा आणि त्यांच्या धार्मिक परंपरेनुसारच घेतला जाईल. कोणत्याही तृतीय पक्षाला, मग तो देश असो वा संस्था, या निर्णयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

दलाई लामाच्या उत्तराधिकारावरून वाद 


६ जुलै रोजी तिबेटी बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा ९० वर्षांचे होतील, त्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावरून सुरू असलेला वाद हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये चीन हस्तक्षेप करू लागला आहे.  दलाई लामा यांच्या भावी उत्तराधिकारी घोषणेसाठी चीनची मान्यता असायला हवी, असे म्हणत चीन नाक खुपसू पाहत आहे. या पार्श्वभूमीवर, भारताचे केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी चीनच्या हस्तक्षेपाच्या प्रयत्नावर टीका केली आहे. 

दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार कोणत्याही देशाला नाही


किरेन रिजिजू यांनी म्हटले आहे की "दलाई लामा यांचे पद सर्वात महत्वाचे आहे. हे पद केवळ तिबेटी लोकांसाठीच नाही तर सर्व बौद्ध उपासकांसाठी महत्त्वाचे आहे. दलाई लामांव्यतिरिक्त इतर कोणालाही दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार नाही. दलाई लामांनी बुधवारी केलेल्या वक्तव्यातही या मुद्द्यावर स्पष्ट भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की, त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचा निर्णय घेण्याचा एकमेव अधिकृत हक्क त्यांच्या 'गाडेन फोडरंग ट्रस्ट'कडेच आहे. चीनने मांडलेल्या उत्तराधिकारी मान्यतेच्या दाव्याला पूर्णपणे फेटाळत त्यांनी ही भूमिका मांडली. चीनकडून करण्यात आलेल्या दाव्याचे खंडन करताना भारताने पुन्हा एकदा तिबेटी बौद्ध परंपरेचा आदर करण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे. "कोणताही देश अगदी चीनसुद्धा दलाई लामांचा उत्तराधिकारी कोण असेल हे ठरवू शकत नाही," असे ठाम मत रिजिजू यांनी व्यक्त केले. देशभरातील बौद्ध अनुयायी दलाई लामांच्या शिकवणी आणि धार्मिक परंपरांचे आजही निष्ठेने पालन करतात, असेही रिजिजू यांनी सांगितले.

हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा केला जाणार दलाई लामांचा वाढदिवस 


दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस येत्या ६ जुलै रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा होणार असून, भारत सरकारकडून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू आणि राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंग या विशेष कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  ही भूमिका भारताने तिबेटी बौद्ध धर्मगुरूंच्या स्वायत्ततेच्या मुद्द्यावर घेतलेली स्पष्ट केली आहे.
Comments
Add Comment

Budget 2026 : कोकणचा काजू-नारळ सातासमुद्रापार जाणार! अर्थमंत्र्यांचा 'हाय-व्हॅल्यू' शेतीवर भर; कोकणकर होणार मालामाल

नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी १ फेब्रुवारी २०२६ रोजी सादर केलेल्या ऐतिहासिक नवव्या

Budget 2026 : पाहा काय स्वस्त अन् काय महाग ? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प सादर!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज १ फेब्रुवारी २०२६ रोजी संसदेत देशाचा २०२६-२७ या

Budget 2026 : अर्थसंकल्पामुळे शिक्षण आणि संशोधनाला मिळणार नवी गती; उच्च शिक्षण, संशोधन, डिझाईन आणि वैद्यकीय तंत्रज्ञान आणि .....

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग ९ व्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या

Budget 2026 : शिक्षण आणि वैद्यकीय खर्चावरील टॅक्समध्ये मोठी कपात; कर ५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांवर

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : शिक्षण आणि वैद्यकीय खर्चावरील टॅक्समध्ये मोठी कपात; कर ५ टक्क्यांवरून थेट २ टक्क्यांवर

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.

Budget 2026 : देशातील प्रत्येक जिल्ह्यात उभारले जाणार 'गर्ल्स हॉस्टेल', ७ नवीन 'हाय-स्पीड कॉरिडॉर; अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली : आज, १ फेब्रुवारी २०२६ रोजी देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत एक नवा इतिहास रचला आहे.