मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेत स्थान देणार नाहीत. कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व धोक्यात येईल,असा टोला नारायण राणे यांनी लगावला. विधानभवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

अडीच वर्षात शिवसेना संपवली

ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात संपवली अस राणे म्हणाले. मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला कोण जबाबदार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना फक्त दोनच दिवस मंत्रालयात आले. आजच त्यांना मराठी कसे आठवले? मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?” जीआर कधी खोटं बोलेल का? कर्तृत्वशून्य व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

राज ठाकरेंना शिवसेनेत छळले

राज ठाकरे पक्षात शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप छळलं होते, शिवसेना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रवृत्त केलं, कुटुंब म्हणून किती जणांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं हे सांगावे? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.

कोण भरत गोगावले?

मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कोण भरत गोगावले मी ओळखत नाही असे सणसणीत उत्तर राणे यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती