मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेत स्थान देणार नाहीत. कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व धोक्यात येईल,असा टोला नारायण राणे यांनी लगावला. विधानभवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

अडीच वर्षात शिवसेना संपवली

ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात संपवली अस राणे म्हणाले. मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला कोण जबाबदार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना फक्त दोनच दिवस मंत्रालयात आले. आजच त्यांना मराठी कसे आठवले? मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?” जीआर कधी खोटं बोलेल का? कर्तृत्वशून्य व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

राज ठाकरेंना शिवसेनेत छळले

राज ठाकरे पक्षात शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप छळलं होते, शिवसेना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रवृत्त केलं, कुटुंब म्हणून किती जणांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं हे सांगावे? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.

कोण भरत गोगावले?

मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कोण भरत गोगावले मी ओळखत नाही असे सणसणीत उत्तर राणे यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment

आर्थिक बेशिस्तीला मुख्यमंत्री फडणवीसांचा लगाम

११ हजार ९९५ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर; वित्तीय शिस्त राखताना अत्यावश्यक बाबींना दिले प्राधान्य मुंबई :

गरजूंपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहचविणे हीच खरी देशसेवा

मुंबई : देशातील गरीब व्यक्तींपर्यंत विनासायास व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहोचविणे हे आपले प्रमुख ध्येय

अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूटमधील गैरव्यवहाराची चौकशी होणार

मुंबई : अलमुरी रत्नमाला इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, सापगाव (ता. शहापूर जि. ठाणे) मधील

मंत्री नितेश राणे यांच्या बंदरे खात्याची उल्लेखनीय कामगिरी

इंडिया मेरिटाईम वीक २०२५ मधील ५६ हजार कोटींचे करार राज्यासाठी ऐतिहासिक यश; आमदार प्रवीण दरेकर बंदरे विभागातील

BKC च्या ट्रॅफिकला ब्रेक! मेट्रो 2B चा महत्वाचा टप्पा पूर्ण

मुंबई : वांद्रे–कुर्ला संकुल आणि आसपासच्या भागातील वाहतूक ताण कमी करण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले गेले आहे.

शाळांमध्ये झळकणार सरकारी योजनांचे फलक; शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : मुंबई विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना असून त्यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे