मातोश्रीकडे डुप्लिकेट शिवसेना

  18

मुंबई : खरी शिवसेना आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे डुप्लिकेट शिवसेना आहे. त्यांनी अडीच वर्षात शिवसेनेची वाट लावली अशी टीका माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी केली. उद्धव ठाकरे काही झालं तरी राज ठाकरेंना त्यांच्या शिवसेनेत स्थान देणार नाहीत. कारण तसं झालं तर उद्धव ठाकरेंचे अस्तित्व धोक्यात येईल,असा टोला नारायण राणे यांनी लगावला. विधानभवनात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे मातोश्री निवासस्थानाचा एक हिस्सा राज ठाकरेंना देणार का असा खोचक सवालही त्यांनी विचारला.

अडीच वर्षात शिवसेना संपवली

ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची उद्धव ठाकरेंनी वाट लावली. ४० वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात संपवली अस राणे म्हणाले. मुंबईत फक्त १८ टक्के मराठी उरलेत. १९६० साली ते ६० टक्के इतके होते. मराठी माणसाला मुंबई बाहेर काढण्याला कोण जबाबदार असेल तर ते उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना फक्त दोनच दिवस मंत्रालयात आले. आजच त्यांना मराठी कसे आठवले? मराठी तरुणांसाठी रोजगार मिळावा यासाठी त्यांनी काय केलं? मराठीचा एवढा पुळका आला असेल तर स्वतःच्या मुलाला इंग्रजी शाळेत का टाकलं? शरद पवार, सोनिया गांधींसोबत गेल्यानंतर त्यांना मराठी आठवली नाही का?” जीआर कधी खोटं बोलेल का? कर्तृत्वशून्य व्यक्ती म्हणजे उद्धव ठाकरे, खोटं बोल पण रेटून बोल म्हणजे म्हणजे उद्धव ठाकरे असा जोरदार हल्ला त्यांनी उद्धव ठाकरेंवर चढवला.

राज ठाकरेंना शिवसेनेत छळले

राज ठाकरे पक्षात शिवसेनेत असताना उद्धव ठाकरेंनी त्यांना खूप छळलं होते, शिवसेना सोडण्याची त्यांची इच्छा नव्हती मात्र उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रवृत्त केलं, कुटुंब म्हणून किती जणांना उद्धव ठाकरेंनी जवळ केलं हे सांगावे? ज्या मराठी माणसाने शिवसेनेला ताकद दिली त्याच मराठी माणसाची वाट उद्धव ठाकरेंनी लावली. 40 वर्षांत बाळासाहेबांनी शिवसेना उभारली. पण तीच शिवसेना अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी संपवली असा आरोप नारायण राणे यांनी केला.

कोण भरत गोगावले?

मंत्री भरत गोगावले यांनी केलेल्या आरोपांबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर कोण भरत गोगावले मी ओळखत नाही असे सणसणीत उत्तर राणे यांनी यावेळी दिले.
Comments
Add Comment

पेंग्विनच्या देखभालीवर २५ कोटी खर्च

मुंबई (प्रतिनिधी) : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहायलातील (राणीची बाग)

गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता भुयारी बोगद्याचा मार्ग मोकळा

मुंबई: मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा

राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान - एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - अजित पवार

मुंबई : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी

शासकीय कार्यालयात 'बर्थडे केक' कापणाऱ्यावर होणार कारवाई

मुंबई : शासकीय कार्यालयात आता अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणे, केक कापणे, सेल्फी, फोटोसेशन करणे महागात

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव, कारवाईची मागणी

विधान परिषदेत शिवसेना आमदाराने उठवला मुद्दा, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आश्वासन मुंबई : महाराष्ट्राची