भाजपा आमदार किसन कथोरेंच्या बंगल्याबाहेर गोळीबार

बदलापूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर गोळीबार झाला. या गोळीबारात एक जण जखमी झाला. दोन गटात झालेल्या वादातून गोळीबार झाला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे.

भाजपा आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या रस्त्यावर गोळीबार झाला. या गोळीबारात अल्ताफ शेख जखमी झाला. अल्ताफला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. पोलीस अल्ताफची डॉक्टरांच्या परवानगीने चौकशी करणार आहेत. गोळीबार प्रकरणी घटनास्थळाच्या परिसरात असलेल्या लोकांकडे चौकशी सुरू आहे. तसेच संबंधित भागातील सर्व सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दोन गटात वाद का झाला ? गोळीबारापर्यंत प्रकरण का ताणले गेले ? गोळीबार कोणी केला ? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. सत्ताधारी आमदाराच्या घराजवळ गोळीबार झाल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Comments
Add Comment

West Bengal Election 2026 : पश्चिम बंगालमध्ये आज दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले सुरू

कोलकाता: पश्चिम बंगाल निवडणूक दुसऱ्या टप्प्यातील मतदान: पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या

Anant Ambani : हिप्पोंना मारु नका, वनतारामध्ये पाठवा; अनंत अंबानी यांची कोलंबिया सरकारला विनंती

मुंबई : उद्योगपती अनंत अंबानी यांचे प्राणीप्रेम पुन्हा एकदा समोर आले आहे. दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशात

Mumbai News : मुंबईत पाण्याचा निचरा करण्यासाठी ५४७ पंपांची आणि फिरते डीवॉटरिंग पंप असणाऱ्या १० वाहनांची व्यवस्था

मुंबईत यंदा पाणी साचण्याची फक्त ८० ठिकाणे मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत पावसाळ्यात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची

BMC News : 'मध्य वैतरणा प्रकल्प राबवताना तुमचे पर्यावरण प्रेम कुठे होते?'

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने गारगाई पाणी प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी स्थायी समिती व महापालिका

single-window clearance : लाईव्ह इव्हेंट्स परवानगीसाठी ‘एक खिडकी’ सुविधा

मुंबई : राज्यातील लाईव्ह मनोरंजन क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. लाईव्ह

Godavari to Narmada : असा होणार गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचा समारोप समारंभ

मुंबई : जलव्यवस्थापन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि जनसहभागातून प्रभावी करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या