अजिंक्य राऊत म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही.."

वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास केला. हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं.अभिनेता म्हणतो वारी म्हणजे,“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!”

अजिंक्य राऊत झी टॉकीजवरील लोकप्रिय भक्तिपर कार्यक्रम ‘मन मंदिरा’ चा निवेदक आहे.रोज भक्तीचा अनुभव शब्दांमधून सादर करणारा अजिंक्य जेव्हा प्रत्यक्ष वारीच्या वाटेवर उतरतो, तेव्हा त्याचं मन भावुक होत. तो सांगतो, “जसं आपण एखाद्या ट्रेकला किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो – खडतर वाटा पार करत, अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेत – तसं काहीसं, पण हजारपटीने खोल, वारीत अनुभवायला मिळतं. इथे ऊन, पाऊस, थकवा, भूक… सगळं विसरून माणसं चालतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय – फक्त श्रद्धा आणि प्रेमामुळं.”
या प्रवासात अजिंक्यला अनेक भाविक भेटले. काही वृद्ध महिला गेली २५ वर्षं वारी करत होत्या. काही तरुण पहिल्यांदाच आले होते. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाची तीच झळक होती. कोणी पाणी देत होतं, कोणी खाऊ वाटत होतं, आणि कोणीतरी फक्त सोबतीनं चालत होतं. वारी म्हणजे माणुसकीचा जिवंत अनुभव आहे.

वारी ही फक्त वैयक्तिक नाही, ती सामाजिक आणि कौटुंबिकही आहे. एक वारकरी अजिंक्यला म्हणाला,“दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र येतो. ही चाल आम्हाला केवळ विठोबाजवळ नेते असं नाही, तर आम्हा सगळ्यांना एकमेकांजवळ आणते. या प्रवासातून आम्हाला पुढच्या वर्षासाठी ऊर्जा मिळते.म्हणून आम्ही दरवर्षी येतो.” या शब्दांत वारीचं खरेपण वर्णन केल आहे. ही एक श्रद्धेची यात्रा असली तरी, ती माणसांमधल्या नात्यांची आणि सामर्थ्याची देखील यात्रा आहे.

झी टॉकीजने यंदा ‘मन मंदिरा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या वारीचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर उपक्रम राबवला. वारीदरम्यान घेतलेली हृदयस्पर्शी दृश्यफुटेज, भाविकांचे अनुभव, आणि अजिंक्य राऊतची भावनिक भेट… हे सगळं ‘मन मंदिरा’च्या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.शेवटी अजिंक्य म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही, ती चालल्यावरच उमगत जाते… आणि एकदा उमगली की ती आयुष्यभर आपल्याला साथ देते!”
Comments
Add Comment

Shree Baba Neem Karoli Teaser : सुबोध भावेच्या बहुप्रतिक्षित 'बाबा नीम करोली' सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अनेक वर्षांपासून काही दिग्गज व्यक्तींच्या आयुष्यावर बायोपिक बनवले जातायत. यामध्ये खेळाडू,

AA22xA6 Is Now Raaka : 'राका' नावासह AA22xA6 चा पोस्टर रिलीज, अल्लू अर्जूनच्या लूकनं घातला धुमाकूळ

मुंबई : सिनेविश्वातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जून ( Allu Arjun) त्याच्या नवा अ‍ॅक्शन सिनेमासह धमाल करण्यासाठी

Prasad Oak : महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये प्रसाद ओकच्या नव्या लूकची चर्चा, लवकरच झळकणार 'या' भूमिकेत

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वात अत्यंत लोकप्रिय असलेल्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या सध्याच्या

Purnimecha Phera : रहस्यमय 'पौर्णिमेचा फेरा सिझन ३’ वेबसीरीज प्रेक्षकांच्या भेटीला, सोशल मीडियावर धूमाकूळ

मुंबई : मराठी सिनेविश्वात आपल्या आगळ्यावेगळ्या कथानकाने आणि सस्पेन्स-थ्रिलरच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं 'हे' कोट्यवधींच सरप्राइज

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना

Lata Deenanath Mangeshkar Award : यंदा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार'ने कैलाश सत्यार्थी सन्मानित

लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार २०२६ यंदा नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांना जाहीर करण्यात आला आहे.