अजिंक्य राऊत म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही.."

वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे, तर चालता चालता स्वतःला शोधणं. श्रद्धेचा, सेवाभावाचा आणि सहअस्तित्वाचा जिवंत अनुभव म्हणजे वारी. यावर्षी अभिनेता अजिंक्य राऊत याने स्वतः पंढरपूरपर्यंतचा पाच दिवसांचा पायी प्रवास केला. हजारो भाविकांसोबत चालत वारीचा आत्मिक गोडवा प्रत्यक्ष अनुभवला. या प्रवासानंतर त्याने अतिशय साध्या शब्दांत वारीचं सार सांगितलं.अभिनेता म्हणतो वारी म्हणजे,“लादलं तर ओझं, स्वीकारलं तर कर्तव्य!”

अजिंक्य राऊत झी टॉकीजवरील लोकप्रिय भक्तिपर कार्यक्रम ‘मन मंदिरा’ चा निवेदक आहे.रोज भक्तीचा अनुभव शब्दांमधून सादर करणारा अजिंक्य जेव्हा प्रत्यक्ष वारीच्या वाटेवर उतरतो, तेव्हा त्याचं मन भावुक होत. तो सांगतो, “जसं आपण एखाद्या ट्रेकला किंवा मॅरेथॉनमध्ये सहभागी होतो – खडतर वाटा पार करत, अनोळखी लोकांबरोबर जुळवून घेत – तसं काहीसं, पण हजारपटीने खोल, वारीत अनुभवायला मिळतं. इथे ऊन, पाऊस, थकवा, भूक… सगळं विसरून माणसं चालतात. कोणत्याही मोबदल्याशिवाय – फक्त श्रद्धा आणि प्रेमामुळं.”
या प्रवासात अजिंक्यला अनेक भाविक भेटले. काही वृद्ध महिला गेली २५ वर्षं वारी करत होत्या. काही तरुण पहिल्यांदाच आले होते. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर भक्तिभावाची तीच झळक होती. कोणी पाणी देत होतं, कोणी खाऊ वाटत होतं, आणि कोणीतरी फक्त सोबतीनं चालत होतं. वारी म्हणजे माणुसकीचा जिवंत अनुभव आहे.

वारी ही फक्त वैयक्तिक नाही, ती सामाजिक आणि कौटुंबिकही आहे. एक वारकरी अजिंक्यला म्हणाला,“दरवर्षी आमचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक एकत्र येतो. ही चाल आम्हाला केवळ विठोबाजवळ नेते असं नाही, तर आम्हा सगळ्यांना एकमेकांजवळ आणते. या प्रवासातून आम्हाला पुढच्या वर्षासाठी ऊर्जा मिळते.म्हणून आम्ही दरवर्षी येतो.” या शब्दांत वारीचं खरेपण वर्णन केल आहे. ही एक श्रद्धेची यात्रा असली तरी, ती माणसांमधल्या नात्यांची आणि सामर्थ्याची देखील यात्रा आहे.

झी टॉकीजने यंदा ‘मन मंदिरा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून या वारीचा अनुभव संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचा सुंदर उपक्रम राबवला. वारीदरम्यान घेतलेली हृदयस्पर्शी दृश्यफुटेज, भाविकांचे अनुभव, आणि अजिंक्य राऊतची भावनिक भेट… हे सगळं ‘मन मंदिरा’च्या विशेष भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.शेवटी अजिंक्य म्हणतो,“वारी ऐकून कळत नाही, ती चालल्यावरच उमगत जाते… आणि एकदा उमगली की ती आयुष्यभर आपल्याला साथ देते!”
Comments
Add Comment

Disha Patani and Talwinder: बॅालिवुड अभीनेत्री पंजाबी सिंगर तलविंदरला करते डेट? नक्की काय आहे विषय..

Disha Patani and Talwinder: बॉलिवूडमधील सर्वात फिट आणि ग्लॅमरस अभिनेत्रींमध्ये दिशा पाटनीचे नाव कायमच आघाडीवर असते. तिची टोन्ड

Big Boss Marathi : कठीण परिस्थितीची आठवण आजही मनात; करण सोनावणे म्हणतो, ‘त्या अनुभवांनी मला घडवलं’

मुंबई : बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाने पहिल्याच आठवड्यात प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं असून, घरातील

नॉर्थ अमेरिकेत रणवीर सिंगचा दबदबा; ‘धुरंधर’चा $20 मिलियन क्लबमध्ये ऐतिहासिक प्रवेश

रणवीर सिंगने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारतीय चित्रपट आता केवळ देशाच्या सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत.

भारताच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या संघटनेचा सिनेमॅटिक प्रवास उलगडणारा ‘शतक’

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा मुंबई : यंदाचे वर्ष (२०२६)

गोव्यातील एक बीच, एकच वेळ … कार्तिक आर्यनसोबत कोण होती ही ‘मिस्ट्री गर्ल’?

मुंबई : गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून समोर आलेल्या काही फोटोंमुळे बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन पुन्हा एकदा

इंडियन आयडॉलमधून चमकलेला आवाज शांत; गायक प्रशांत तमांग यांचे वयाच्या ४३व्या वर्षी निधन

मुंबई : मनोरंजन विश्वासाठी धक्कादायक बातमी समोर आली असून, ‘इंडियन आयडॉल’च्या तिसऱ्या पर्वातून देशभर लोकप्रिय