विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पंढरपूरसाठी १३० जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जूनपर्यंत ६२ गाडांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर पंढरपूरहून येणाऱ्या ७८ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मुंबईतील नागरिकांना भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी मुंबई विभागाच्या पाचही आगारांतून विशेष १३० बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येतानादेखील १३० गाड्यांची व्यवस्था असणार आहे.


ग्रुप बुकिंग असेल, तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही एसटी विभागाकडून सांगण्यात आले. ६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय करण्यात येते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील भाविकांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

BMC Election : दोन दिवसांत सुमारे ७ हजार उमदेवारी अर्जांची विक्री, दोन उमेदवारांनी भरले अर्ज

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ च्या अनुषंगाने बुधवारी २४ डिसेंबर २०२५

Eknath Shinde : एकनाथ शिंदे-गणेश नाईक यांच्यात मनोमिलन? - मंत्रालयात बंद दाराआड चर्चा

नवी मुंबई पालिकेसह ठाण्यातील जागावाटपाचा तीढा सुटणार मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि नवी मुंबईतील

Chandrashekhar Bawankule : ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणूक फंडा - चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : "ठाकरे बंधूंची युती हा केवळ निवडणुकीचा फंडा असून, जनतेला याची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी मुंबई

Devendra Fadanvis : राज्य मंत्रिमंडळाचा मोठा धडाका! नगराध्यक्षांची ताकद वाढली; आता मिळणार थेट...वाचा सविस्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता