विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात आली असून, पंढरपूरसाठी १३० जादा बस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३० जूनपर्यंत ६२ गाडांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, तर पंढरपूरहून येणाऱ्या ७८ गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.


आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूरला श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी मुंबईतील नागरिकांना भाविकांना पंढरपूरला जाता यावे, यासाठी मुंबई विभागाच्या पाचही आगारांतून विशेष १३० बसेस पंढरपूरला सोडण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच येतानादेखील १३० गाड्यांची व्यवस्था असणार आहे.


ग्रुप बुकिंग असेल, तर थेट गावातूनच पंढरपूरला बस सोडण्यात येणार असल्याचेही एसटी विभागाकडून सांगण्यात आले. ६ जुलैला आषाढी एकादशीनिमित्त भाविक पंढरपूरला दर्शनासाठी जातात. एसटी प्रशासनाकडून दरवर्षी जादा बसेसची सोय करण्यात येते. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून जादा बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राज्यातील भाविकांच्या मागणीनुसार एसटी प्रशासनाकडून आणखी बसेस वाढवण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

अशोक हांडे यांनी महापालिका शाळेतील ती व्यक्त केली खंत...म्हणाले ,तर मोठा कलाकार झालो असतो!

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीचे शिक्षक हे खूप प्रतिभावान आहेत. शैक्षणिक

गोरेगाव–मुलुंड जोड रस्ता प्रकल्प: दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके चित्रनगरी दरम्यानचे काम प्रगतीपथावर

मुंबई (खास प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्‍प (GMLR) अंतर्गत दिंडोशी न्‍यायालय ते दादासाहेब फाळके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या होणार घोषणा, कोहली-रोहितचे पुनरागमन निश्चित!

मुंबई: टीम इंडियाचा दिग्गज क्रिकेटर्स रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेटपासून दूर आहेत. रोहित

शेकापच्या जयंत पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट, महामोर्चाची तयारी ?

मुंबई : नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. विमानतळा दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची

BMC ची मोठी भेट: आता हॉस्पिटलमध्ये 'मोफत' आणि 'कॅशलेस' उपचार!

मुंबई: मुंबई महानगरपालिकेने (BMC) आरोग्याच्या सोयी चांगल्या करण्यासाठी एक खूप चांगली गोष्ट सुरू केली आहे. या नव्या

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान अंतिम विशेष फेरी

मुंबई : राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल