महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. विधानसभेत वीज मीटर संदर्भात एक तारांकीत प्रश्न आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात विजेचे स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. या मीटरच्या मदतीने बिलिंग केले जाते; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतापर्यंत २८ हजार २०२ वाहिन्यांवर स्मार्ट माटर बसविले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ७ हजार ५०७ पैकी १ लाख ४० हजार ५६१ रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) स्मार्ट मीटर बसविले आहेत. राज्यातील २ कोटी २४ लाख ८८ हजार ग्राहकांपैकी ३२ लाख २३ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतली आहेत. ही सर्व स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत; अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्मार्ट पोस्टपेड मीटर रिअल-टाइम डेटा पुरवतात. यामुळे नेमकी किती वीज वापरली याची अचूक आकडेवारी कंपनीला आणि ग्राहकाला मिळते. या आकडेवारीआधारे योग्य ते बिल ग्राहकाला आकारले जाते. चेक, थेट खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर अथवा युनिफाईड पेमेंट सर्व्हिस अर्थात यूपीआयच्या मदतीने ग्राहक बिलाचा भरणा कंपनीला करू शकतात.
Comments
Add Comment

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा