महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

  65

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. विधानसभेत वीज मीटर संदर्भात एक तारांकीत प्रश्न आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना राज्यात विजेचे स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत. या मीटरच्या मदतीने बिलिंग केले जाते; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आतापर्यंत २८ हजार २०२ वाहिन्यांवर स्मार्ट माटर बसविले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ७ हजार ५०७ पैकी १ लाख ४० हजार ५६१ रोहित्रांना (ट्रान्सफॉर्मर) स्मार्ट मीटर बसविले आहेत. राज्यातील २ कोटी २४ लाख ८८ हजार ग्राहकांपैकी ३२ लाख २३ हजार ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवून घेतली आहेत. ही सर्व स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर आहेत; अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्मार्ट पोस्टपेड मीटर रिअल-टाइम डेटा पुरवतात. यामुळे नेमकी किती वीज वापरली याची अचूक आकडेवारी कंपनीला आणि ग्राहकाला मिळते. या आकडेवारीआधारे योग्य ते बिल ग्राहकाला आकारले जाते. चेक, थेट खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर अथवा युनिफाईड पेमेंट सर्व्हिस अर्थात यूपीआयच्या मदतीने ग्राहक बिलाचा भरणा कंपनीला करू शकतात.
Comments
Add Comment

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता

नोकरीच्या शोधात आहात? तर ही बातमी आहे तुमच्यासाठी

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती, ८,७६७ पदांना मान्यता मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७

रवींद्र चव्हाण नवे भाजपा प्रदेशाध्यक्ष, बिनविरोध निवड

भाजपाची कोकणातील ताकद आणखी वाढणार मुंबई : भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी

RailOne ॲप लाँच, आता सर्व सुविधा एकाच जागी मिळणार, तिकीट बुकिंगपासून ते लाईव्ह ट्रेन ट्रॅकिंग

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी आता आनंदाची माहिती आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेने एक नवीन

ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी

Devendra Fadanvis : "...नंतर गाशा गुंडाळून गायब होतात", CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन

'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही'- मुख्यमंत्री फडणवीस मुंबई : आज विधानसभेत टोरेस कंपनीच्या (Torres Company)