कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष


डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण १८ जागांपैकी १५ जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून २ जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी पाचपर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या ९०.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत २३५८ मतदारांपैकी तब्बल २१३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांपैकी एकूण १७ जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ५१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.


या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये