कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष


डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण १८ जागांपैकी १५ जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून २ जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी पाचपर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या ९०.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत २३५८ मतदारांपैकी तब्बल २१३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांपैकी एकूण १७ जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ५१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.


या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

ठाण्यात २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

ठाणे: 'ठाणे महानगरपालिकेने' (TMC) जाहीर केले आहे की, ठाणे शहराच्या काही भागांमध्ये २४ तासांसाठी पाणीपुरवठा खंडित

गणपत गायकवाड यांना मोठा दिलासा; कोळसेवाडी पोलीस ठाणे राडा प्रकरणात निर्दोष मुक्तता

कल्याण: माजी आमदार गणपत गायकवाड यांना एक मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. २०१४ मध्ये कल्याणच्या कोळसेवाडी पोलीस

ठाणे, नवी मुंबई, पालघरमध्ये मुसळधार! हवामान खात्याने दिला रेड अलर्ट

सखल भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: ठाण्यात सततच्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

घोडबंदरवासियांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्तता, उपमुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडवर

जड वाहने रात्री १२ नंतर सोडण्याचे शिंदे यांचे आदेश ठाणे: घोडबंदर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत

अंबरनाथ, बदलापुरात यंत्रणा कुचकामी

रासायनिक कंपन्यांकडून पाण्याच्या प्रवाहांमध्ये विषारी रसायने अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूरवासीयांना पाणी व

कल्याणमध्ये मराठीची सक्ती आहे का, विचारत महिलेची अरेरावी

१५ ऑक्टोबरपर्यंत मराठी न आल्यास दुकानातून खरेदी न करण्याचे आवाहन कल्याण : कल्याण, प. येथील 'पटेल आर मार्ट'मध्ये