कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा झेंडा

१८ जागांपैकी १५ जागांवर महायुती विजयी, २ महाविकास आघाडी, तर १ अपक्ष


डोंबिवली : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बाजार समितीवर महायुतीचा झेंडा फडकला असून एकूण १८ जागांपैकी १५ जागा महायुतीच्या कोट्यात पडल्या असून २ जागांवर महाविकास आघाडी तर एक जागा अपक्ष उमेदवाराला मिळाली असल्यामुळे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर मतदात्यांनी महायुतीला एक हाती सत्ता देऊन आपला विश्वास दाखविला.


कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल शनिवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आला. निवडणुकीत पार पडलेल्या मतदान प्रक्रियेला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. शनिवारी सकाळी सात वाजता मतदानासाठी मोठी गर्दी केली होती. तर सायंकाळी पाचपर्यंत मतदानाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून एकूण मतदानाच्या ९०.३७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत २३५८ मतदारांपैकी तब्बल २१३१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, यामध्ये महिलांचा सहभागही लक्षणीय होता. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागांपैकी एकूण १७ जागांसाठी हे मतदान झाले असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १५५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी १५ अर्ज बाद असून प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात ५१ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले होते.


या निवडणुकीत विजयी उमेदवार रवींद्र घोडविंदे, कपिल थळे, भरत गोंधळे, योगेश धुमाळ, अरुण पाटील, जालिंदर पाटील, मनोहर पाटील, विद्या पाटील, शारदा पाटील, वसंत लोणे, रवींद्र आव्हाड, नरेश सुरोशी, रवींद्र भोईर, किशोर वाडेकर, विजय सुरोशी, काशिनाथ नरवडे आणि गिरीश पाटील हे उमेदवार प्रत्यक्षात निवडणूक लढवून जिंकले असून हमाल व तोलाई गटातील शंकर आव्हाड हे बिनविरोध निवडून आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विशाल जाधव यांनी दिली.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या