Maharashtra Monsoon Session 2025: इंद्रायणी पुलाचा मुद्दा विधानसभेत, पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल झाली चर्चा

मुंबई: राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सोमवारी ३० जूनपासून सुरू झाले असून, आज पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडला.  अधिवेशनाचा पहिला दिवस हा हिंदी सक्तीवरून गाजला तर दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक झालेले दिसून आले. या संदर्भात शक्तिपीठ महामार्ग बंद करण्याचे आवाहन सरकारला विरोधकांनी केली. तसेच

मंगळवारी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली.  कामकाजाच्या सुरुवातीला प्रश्न-उत्तराचे सदर झाले. ज्यामध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आले. ज्यात इंद्रयणी नदीवरील जीर्ण पूल अपघाताचा मुद्दा देखील उचलून धरला गेला. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार चेतन तुपे यांनी या सदरात कुंडमळा पूल अपघातासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकार अशा पूलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल प्रश्न विचारला.

काय म्हणाले चेतन तुपे?


चेतन तुपे यांनी कुंडमळा दुर्घटनेसंबंधीत, शासन कोणती कारवाई करणार याबद्दल प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, "अशा पुलांवर पर्यटकांची गर्दी जर झाली तर ते ढासळण्याची भीती सर्वाधिक आहे. त्यामुळे यानंतरही असे कमकुवत पूल आढळले, तर काय कारवाई करणार? आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेविषयी ही सभागृहात प्रश्न उपस्थित केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे उत्तर


चेतन तुपे यांनी मांडलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंहराजे भोसले यांनी म्हंटले, "पूल धोकादायक असल्याचा फलक लावून देखील, पर्यटक मोठ्या संख्येने तिथे जमले. याठिकाणी जास्त पर्यटक आल्यामुळे पुल कोसळला, त्यात चार लोकांचा मृत्यू झाला. ही बाब गंभीर आहे. राज्यात असे अनेक धोकादायक पूल आणि पर्यटन स्थळ आहेत.  सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत १६ हजार ३९५ पुल राज्यात आहेत. पावसाळ्याआधी या सर्व पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केले होते. त्यानुसार राज्यात चार पुल अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत. तसेच आठ पुलांचे अजूनही स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल हाती यायचे बाकी आहेत. पण या चार व आठ अशा बारा पुलांची डागडुजी व बांधणी करण्याबाबत कार्यवाई करू." असे आश्वासन त्यांनी दिले.

त्याचप्रमाणे, अशी घटना पुढे पुन्हा कधीच घडणार नाही यासाठी योग्य ती अंमलबजावणी आणि खबरदारी घेत असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याबद्दल बोलताना ते म्हणाले, "इंद्रायणी नदीवर अपघातग्रस्त पूल नव्याने बांधण्याचे नियोजन केले जाईल, असे पुल ज्याठिकाणी असतील, तिथे ते वापरू नयेत म्हणून फलक लावून पूर्णपणे बंद केले जातील. त्यासाठी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाईल."

 
Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य