Bangalore stampede : 'पोलीस हे काही देव अथवा जादूगार नाहीत', बंगळुरू चेंगराचेंगरीसाठी RCB जबाबदार

बंगळुरू: केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकारणे ४ जूनला बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीसाठी RCB(रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)ला जबाबदार ठरवले आहे. संघाने पोलिसांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अचानक विजयी परेडची घोषणा केली. यामुळे लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झाली. या चेंगराचेंगरीत ११ जणांचा मृत्यू झाला होता.


न्यायधिकारणाने आपल्या विधानात म्हटले की, प्राथमिकदृष्ट्या हे समोर दिसत आहे की साधारण तीन ते पाच लाख लोकांची गर्दी एकत्र जमा करण्यासाठी आरसीबी जबाबदार आहे. आरसीबीने पोलिसांकडून याबाबतची कोणतीही परवानगी घेतली नाही. अचानक सोशल मीडियावर पोस्ट आली आणि त्यामुळेच इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा झाले.


न्यायधिकरणाने आरसीबीकडून अचानक करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची घोषणा ही अव्यवस्था पसरवणारे असल्याचे म्हटले आहे. आदेशात म्हटले की आरसीबीने कोणत्याही पूर्व परवानगीशिवाय अचानक या प्रकारची अव्यवस्था उत्पन्न केली. त्यामुळे केवळ १२ तासांत पोलीस सर्व आवश्यक व्यवस्था पोलीस अधिनियम अंतर्गत करेल अशी आशा कशी करू शकतो.


आरसीबीने आपल्या पहिल्या आयपीएल विजयाच्या दुसऱ्या दिवशी ४ जूनला एका विजयी परेडची घोषणा सोशल मीडियावर केली होती. न्यायाधिकरणने पोलिसांच्या या भूमिकेचा बचाव करताना म्हटले, पोलीस कर्मचारीही माणूस आहेत. ते देव नाहीत आणि जादूगारही नाहीत. त्यांच्याकडे अल्लादीनचा चिराग सारखे जादूचे यंत्र नाही जे बोट फिरवल्यावर कोणाचीही इच्छा पूर्ण करू शकतील.


न्यायाधिकरणनेही हे ही स्पष्ट केले की पोलिसांना पुरेशा तयारीसाठी योग्य तो वेळ दिला गेला नाही. ४ जून २०२५ला वेळेच्या कमतरतेमुळे पोलीस आवश्यक की व्यवस्था करू शकले नाहीत. पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही.


Comments
Add Comment

Sanjay Manjrekar : वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वालच्या आक्रमक वर्तनावर मांजरेकरांचा संताप; BCCI-ICC कडे कारवाईची मागणी

मुंबई : माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या

Anaya Bangar : पुरूषाची महिला झाल्यानंतर आता अनाया बांगरच्या कमबॅकचा मार्ग मोकळा; 'या' लीगमधून उतरणार मैदानावर

Anaya Bangar WBBL : अनाया बांगरने (Anaya Bangar) क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. क्रिकेट

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी

Rahul Dravid : टीम इंडियाला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी, पण मार्ग खडतर - राहुल द्रविड

नवी दिल्ली : भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे मत आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (डब्ल्यूटीसी)

Kedar Jadhav : क्रिकेटच्या पिचवरून राजकारणाच्या मैदानात; केदार जाधवला भाजपमध्ये मिळाली मोठी जबाबदारी!

Mumbai : टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात एका नव्या भूमिकेत झळकणार आहे.

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो