ज्या कंपन्यांमुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत असेल त्यांच्यावर कारवाई करू

मुंबई : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमधून रसायन मिश्रीत पाणी नदीत सोडले जाते. यामुळे पिण्याचे पाणी प्रदूषित होत आहे. याप्रकरणी प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली. या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई केली जाईल. ताकीद देऊनही प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया नदीत सोडणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. प्रदूषण केल्याप्रकरणी राज्यातील ३१८ उद्योगांना उत्पादन बंद करण्याचे आदेश दिल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत दिली.

जल प्रदूषण प्रकरणी एका कंपनीवर नियमानुसार कारवाई झाली आहे. या कंपनीला १८ जून रोजी उद्योग बंद असा आदेश देण्यात आला आहे. आणखी काही कंपन्या जल प्रदूषण करत असल्यास त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. राज्यात विना परवानगी उद्योग करता येणार नाही. अनधिकृत उद्योगांना राज्यात थारा दिला जाणार नाही. पर्यावरणाशी संबंधित नियमांचे पालन करणाऱ्या कंपन्यांना राज्यात काम करता येईल. पण ज्या कंपन्या पर्यावरणाचा ऱ्हास रत असतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.

ठाणे जिल्ह्यात १८८० कारखाने रेड झोन मध्ये आहेत आणि साठ पेक्षा जास्त कंपन्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण करत आहेत.नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, असे भाजपा आमदार अतुल भातखळकर म्हणाले. भातखळकरांनी हा मुद्दा मांडताच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी एक महत्त्वाची माहिती दिली.
Comments
Add Comment

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे

BMC News : कचरा कंत्राटदारांकडून पुरेशी वाहने उपलब्ध होईनात; मुंबईत पुन्हा दिसू लागले कचऱ्याचे ढिग

- सहायक आयुक्तांसह अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येते अपयश मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील जुन्या कचरा

Goregaon Mulund Link Road : गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांच्या भूमिगत मार्गासाठी तुळशी सरसावला

बोगदा प्रकल्प खोदकामााल सोमवारी १७ ऑगस्ट रोजी झाला प्रारंभ मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका

Mumbai News : 'आमचे मृतदेह घेऊन जा', कुलाबा सामूहिक मृत्यू प्रकरणात नवे खुलासे

मुंबई : मुंबईतील कुलाबा येथील नेव्ही नगरमधील सामूहिक मृत्यू प्रकरणाच्या तपासात नवनवीन माहिती समोर येत आहे. या