ऑगस्ट अखेरीस जरांगे आणि हाके मुंबईत आमनेसामने ?

मुंबई : केंद्र सरकारने जनगणना करताना प्रत्येक व्यक्तीची जातीची माहिती घेण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. या सर्व परिस्थितीची माहिती असताना मनोज जरांगे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा घेऊन २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलनासाठी येण्याची तयारी करत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना जरांगेंनी तसे सूतोवाच केले. जरांगेंनी मुंबईत धडक मारण्याचा इशारा देताच लक्ष्मण हाके आणि त्यांच्या ओबीसी समर्थकांच्या हालचालींनाही वेग आला आहे. सरकारने कोणाच्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबावाखाली येऊन पक्षपात करणारा निर्णय घेऊ नये यासाठी ओबीसींनी मुंबईत धडक मारण्याचे नियोजन सुरू केले आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून २७ ऑगस्ट रोजी ‘चलो मुंबई’ आंदोलनाची सुरुवात होणार आहे. दोन दिवसांत मुंबई गाठून २९ ऑगस्ट रोजी तेथे शांततापूर्ण आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी आंतरवालीत पार पडलेल्या मराठा समाजाच्या बैठकीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी या आंदोलनाची औपचारिक घोषणा केली आहे.

जरांगेंनी मुंबईत धडक मारण्याची घोषणा करताच लक्ष्मण हाके आणि त्यांचे ओबीसी समर्थक सक्रीय झाले आहे. ओबीसी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी त्यांनी पुण्यात समाजाची बैठक बोलावली आहे. ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये यासाठी मुंबईत धडक मारणार असल्याचे लक्ष्मण हाके आणि त्यांच्या ओबीसी समर्थकांनी सांगितले. पुण्यात ४ जुलै रोजी बैठक घेऊन पुढील नियोजन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. समाजाची १५ जुलै रोजी मोठी बैठक होईल असेही त्यांनी सांगितले.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.