Maharashtra Assembly Session: पावसाळी अधिवेशनासाठी सुलभा खोडके तालिका सभाध्यक्ष

मुंबई: राज्य विधी मंडळाच्या पावसाळी अधिवेशन २०२५ ला आज सोमवार दिनांक ३० जुनपासून मुंबई येथे सुरुवात झाली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेच्या तालिका सभाअध्यक्ष म्हणून जेष्ठ विधानसभा सदस्य सुलभा संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालविण्यासाठी पीठासीन सभाअध्यक्ष अँड.राहुल नार्वेकर यांच्याबरोबरच सभागृह चालविण्यासाठी तालिका अध्यक्ष म्हणून सुलभाताई संजय खोडके यांचे नाव घोषित झाल्याने सभागृहातील सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विधानसभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यंमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देखील उपस्थित होते.

तालिका अध्यक्षांचे काम काय असते?


राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात साधारणत: आठ तासांचे कामकाज चालणे अपेक्षित असते . अर्थातच आठ तास पीठासीन अध्यक्ष त्या खुर्चीवर बसून राहू शकत नाहीत. त्यामुळे अध्यक्ष अनुपस्थित असतील तेव्हा सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी तालिका अध्यक्षांचे एक पॅनल तयार करण्यात येते. या पॅनलवर महाराष्ट्र विधानसभेच्या नियम ८ पोट नियम १ अन्वये तालिका सभाध्यक्ष म्हणून आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

सुलभा खोडके ह्या महाराष्ट्र विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आल्या असून एक अभ्यासू व विधानसभेच्या कामकाजही उत्तम जाण असलेल्या जेष्ठ सदस्य म्हणून सुद्धा त्यांची सभागृहात ओळख आहे. विधानसभेत ज्या पक्षाचे आमदार जास्त असतात. त्या पक्षातील जेष्ठ सदस्यांची तालिका सभाध्यक्ष म्हणून अधिवेशन काळात घोषणा करण्यात येते. त्यानुसार अमरावतीच्या आमदार सुलभाताई खोडके यांची पावसाळी अधिवेशनाच्या तालिका सभाध्यक्ष म्हणून घोषणा झाली असून पीठासीन अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अनुपस्थितीत त्या अधिवेशनाचे कामकाज सांभाळणार आहेत.
Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे