सहा वर्षीय मुलीच्या चिकटलेल्या बोटांवर यशस्वी सर्जरी

ठाणे : जन्मजात हातापायाची बोटे चिकटलेली असल्यास भविष्यात त्याचा त्रास होण्याचा संभव असतो. वेळेत शस्त्रक्रिया करणे महत्वाचे असले तरी चिकटलेल्या बोटांची शस्त्रक्रिया करून त्यांची प्लॅस्टिक सर्जरी करणे खर्चिक असते; परंतु सर्वसामान्यांसाठी अशी शस्त्रक्रिया आता सिव्हिल रुग्णालयात होत असून, रुग्णालयात भिवंडीतील एका लहान मुलीच्या यशस्वी प्लॅस्टिक सर्जरीनंतर तिच्या डाव्या हाताची दोन चिकटलेली बोटं आता स्वतंत्रपणे हालचाल करू लागणार आहेत.


भिवंडी परिसरात राहणारी अंजू (नाव बदलले आहे) ही मुलगी सहा वर्षांची असून तिच्या दोन्ही हाताची मधले आणि बाजूच बोटं आणि पायाची करंगळी आणि बाजूचे बोट जन्मतःच चिकटलेली होती. त्यामुळे लेखन, खेळ, वस्तू उचलणे यासारख्या मूलभूत हालचाली करणेही तिला अवघड जात होते. तिच्या या स्थितीमुळे आईवडील चिंतेत होते, पण उपचारांचा खर्च परवडत नव्हता. अशा जन्मजात दोषांवर वेळेवर शस्त्रक्रिया करणे अत्यावश्यक असते.



अंजूच्या पालकांनी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचा पर्याय निवडला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धीरज महांगडे, यांच्या मार्गदर्शनाखाली अंजूच्या डाव्या हातावर नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असल्याची माहिती प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड यांनी दिली.


साधारण एक तासांच्या सर्जरीनंतर मधले व बाजूचे चिकटलेले बोट वेगळे करण्यात यश आले आहे. मुलीच्या हाताची हालचाल सुधारण्यास सुरुवात झाली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पुढील काळात योग्य फिजिओथेरपी आणि काळजी घेतल्यास ती बोटे पूर्णतः कार्यक्षम होतील. या शस्त्रक्रियेसाठी वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, प्लॅस्टिक सर्जन डॉ. अभिषेक धाकड, भूल तज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे, प्रीती पगारे, भक्ती प्रिठे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या