Rajesh Meena: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई: आज, ३० जून २०२५ रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena)  यांना मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) नियुक्त करण्यात आले. सुजाता सौनिक (Sujata Saunik) निवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार तात्काळ लागू झाला. राजेश कुमार मीना मूळचे राजस्थानचे असून, ते महाराष्ट्र कॅडरचे एक वरिष्ठ आणि कार्यक्षम प्रशासक मानले जातात.


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.  अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याला आता महाराष्ट्र नोकरशाहीचे सर्वोच्च पद देण्यात आले आहे. 



राजेशकुमार मीना यांच्या नियुक्तीचे कारण


राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.  

राजेश मीना महसूल विभागात एसीएस


राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 



निवृत्तीच्या २ महिने आधी जबाबदारी


यापूर्वी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सीएस होत्या, त्या आज (३० जून) निवृत्त झाल्या.  त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील होत्या. त्याच वेळी, राजेश कुमार मीना या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या २ महिनेआधी, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.


 
Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा