Rajesh Meena: महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिवपदी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची नियुक्ती

मुंबई: आज, ३० जून २०२५ रोजी वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना (Rajesh Kumar Meena)  यांना मुख्य सचिवपदी (Chief Secretary of Maharashtra) नियुक्त करण्यात आले. सुजाता सौनिक (Sujata Saunik) निवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यभार तात्काळ लागू झाला. राजेश कुमार मीना मूळचे राजस्थानचे असून, ते महाराष्ट्र कॅडरचे एक वरिष्ठ आणि कार्यक्षम प्रशासक मानले जातात.


राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि १९८८ च्या बॅचचे आयएएस अधिकारी राजेश कुमार मीना यांची महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे.  अनेक महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर जबाबदारी सांभाळणाऱ्या या अधिकाऱ्याला आता महाराष्ट्र नोकरशाहीचे सर्वोच्च पद देण्यात आले आहे. 



राजेशकुमार मीना यांच्या नियुक्तीचे कारण


राजेशकुमार मीना यांच्यासोबतच राज्याच्या मुख्य सचिवपदासाठी गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हेदेखील शर्यतीत होते. पण, प्रशासनात राजेशकुमार मीना हे सर्वात ज्येष्ठ असल्याने राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी सरकारकडून त्यांच्या नावालाच अधिक पसंती देण्यात आली आहे.  

राजेश मीना महसूल विभागात एसीएस


राजेश कुमार मीना यांना कामाचा व्यापक अनुभव आहे. ते सध्या महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करत आहेत. आतापर्यंत त्यांनी विविध विभागांमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. 



निवृत्तीच्या २ महिने आधी जबाबदारी


यापूर्वी सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या सीएस होत्या, त्या आज (३० जून) निवृत्त झाल्या.  त्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव देखील होत्या. त्याच वेळी, राजेश कुमार मीना या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या २ महिनेआधी, महाराष्ट्र सरकारने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे मुख्य सचिव पदासाठी त्यांच्याकडे जुलै आणि ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी असणार आहे. दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित झाल्या तर राजेशकुमार मीना यांना मुख्य सचिव पदासाठी मुदतवाढ मिळू शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. याआधी अजोय मेहता, नितीन करीर या दोन ज्येष्ठ माजी सनदी अधिकाऱ्यांना निवडणुकीच्या काळात राज्याच्या मुख्य सचिव पदावर मुदतवाढ मिळाली होती.


 
Comments
Add Comment

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना

Bacchu Kadu Farmers Andolan : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडू आज मुंबईत; संध्याकाळी ७ वाजता थेट मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा!

७ वाजता महाबैठक! मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार मुंबई : शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून

Weather Updates : समुद्र खवळणार, प्रशासनाची मोठी खबरदारी! हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा मोठा निर्णय

अरबी समुद्र (Arabian Sea) आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) झालेल्या हवामान बदलांमुळे (Weather Changes) महाराष्ट्राच्या

प्रतीक्षा संपली! नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नेरळ-माथेरान मिनी ट्रेन धावणार!

नेरळ : मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ-माथेरान दरम्यानची बहुप्रतिक्षित मिनी ट्रेन सेव