उद्धव ठाकरेंचे बेगडी मराठी प्रेम, खासदार राणेंची टीका

मुंबई : मुख्यमंत्री असताना हिंदी सक्तीचा जीआर काढणारे उद्धव ठाकरे आता झोपेचं सोंग घेत आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पाठोपाठ खासदार नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम बेगडी आहे. राजकीय स्वार्थासाठी उद्धव 'मराठी प्रेम' दाखवत आहेत. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम कुठे गेले होते ? मराठी माणसाच्या नोकरी, व्यवसायासाठी, पोटाच्या प्रश्नासाठी उद्धव ठाकरेंनी काय केले ? मराठीच्या नावावर फक्त स्वतःचे कल्याण करुन घेतले. मराठी माणसाच्या आणि मराठी भाषिकांच्या कल्याणाचे काय ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राची राजधानी असूनही मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी १८ पर्यंत खाली घसरली आहे. याला जबाबदार कोण ? असाही प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. मागील दोन दशकांपेक्ष जास्त काळापासून मुंबई महापालिकेत ठाकरेंची सत्ता आहे. पण याच काळात मुंबईतून मराठी माणूस हळू हळू हद्दपार होऊ लागला. उद्धव ठाकरेंना मराठी माणसांविषयी प्रेम आहे असे ते म्हणतात. पण उद्धव ठाकरेंची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत का शिकली ? असा प्रश्न खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे.

सरकारने दोन जीआर रद्द केले म्हणून विजयी मेळावा काढणे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे असेच म्हणावे लागेल, या शब्दात खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

Comments
Add Comment

फास्टटॅग नसलेल्या वाहनचालकांना आजपासून दुप्पट पैसे मोजावे लागणार

यूपीआयद्वारे पेमेंट करणाऱ्यांना १.२५ पट जास्त रकमेचा दंड मुंबई  : नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ

सैन्याने १६ हजार फूट उंचीवर मोनोरेल चालवली

ईटानगर : भारतीय लष्कराच्या गजराज कॉर्प्सने एक इन-हाऊस हाय-अल्टिट्यूड मोनोरेल सिस्टम विकसित केली आहे. हे स्मार्ट

बिहारमधील विजयानंतर बोलले पंतप्रधान मोदी, सर्वपक्षीय नेत्यांचे आणि नागरिकांचे मागितले सहकार्य

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएने मिळवलेल्या विजयाचा उत्सव आज दिल्लीत रंगला. निकाल

पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा दोन जागांवर विजय

नवी दिल्ली : देशातील सात राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. भाजप आणि

CSMT परिसरात सापडलेल्या त्या बॅगेत नेमकं काय सापडलं ?

मुंबई : देशातील प्रमुख शहरांमध्ये सुरक्षेची परिस्थिती अधिक ताणलेली असताना, मुंबईत आज पुन्हा एकदा संशयास्पद

देशभरात सहा कोटी मृतांचे आधारकार्ड सक्रिय

नवी दिल्ली : आधारकार्ड ओळखीचा पुरावा ग्राह्य धरला जातो. आधारकार्ड असेल तरच बँक खाते उघडले जाते. सरकारी योजनांचा