शेतकऱ्यांना घरबसल्या मिळणार शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती

  65

जिल्हा परिषद कृषी विभागाचा अभिनव उपक्रम


ठाणे : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शेतीच्या कामात झाला तर, शेतकऱ्यांना किती सोयीस्कर होईल या उद्देशाने, ठाणे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ब्लॉगस्पॉट हा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध होणार आहे. त्यासह, कृषी विभाग या तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहे. ब्लॉगस्पॉट या उपक्रमाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीसंदर्भातील दैनंदिन माहिती घरबसल्या एका क्लिक वर उपलब्ध होणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.


ठाणे जिल्ह्यात सध्या एकूण १६२ रासायनिक खत विक्री केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवरून खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या अनुदानित खतांची विक्री करण्यात येते. मात्र अनेकदा खतांची उपलब्धता कळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांना वेळ व संसाधनांचा अपव्यय होतो. याला पर्याय म्हणून कृषी विभागाने ब्लॉगस्पॉट तयार केलेला आहे. (https://adothane.blogspot.com/p/box-sizing-border-box-margin-0-padding_72.html) हा पर्याय शेतकऱ्यांसाठी एक प्रगत व पारदर्शक डिजिटल साधन ठरत आहे.


या ब्लॉगस्पॉटच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या रासायनिक खतांचा साठा, खतांचे प्रकार, केंद्र चालकांचा मोबाईल क्रमांक, यासारखी माहिती सहज उपलब्ध होते. यावर जिल्हानिहाय, तालुकानिहाय आणि केंद्रनिहाय माहिती दररोज अद्ययावत करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना खत खरेदीचे अचूक नियोजन करण्यासह गरजेनुसार योग्य केंद्राची निवड करता येत आहे.


ब्लॉगस्पॉट वापरणे अत्यंत सुलभ आहे. हे कोणत्याही स्मार्टफोनवर मोफत उपलब्ध आहे. यावरील माहिती संपूर्णपणे पारदर्शक आणि सार्वजनिक वापरासाठी खुली आहे, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला योग्य वेळेत योग्य माहिती मिळू शकते.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर