वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

  45

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर विष्णुनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीराम मिसाळ, आंबिवले, अंकुलकर रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत असताना रिक्षाचालक राहुल कुमरे हा रिक्षा वाहनतळ सोडून महात्मा गांधी रस्त्यावरील रसरंजन हॉटेलसमोर प्रवासी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून होता.


रस्त्यात रिक्षा उभी केल्याने पादचारी, वाहतुकीला अडथळा येत होता. गस्तीवरील पोलिसांनी रिक्षाचालक राहुल कुमरे यास नियमबाह्य पद्धतीने रिक्षा रस्त्यावर उभी केल्याचे सांगितले. यामुळे अपघात होण्याची, वाहतुकीला अडथळा होत असल्याची कारणे देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



दुसऱ्या घटनेत हनुमंत दत्तात्रय पष्टे हे रिक्षाचालक डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. ते गणेशनगर भागात राहतात.


विष्णुनगर मासळी बाजार भागात रेल्वेस्थानकातून बाहेर येणारे प्रवासी, महात्मा गांधी रस्ता, कोपर उड्डाणपूल, गुप्ते रस्ता भागातून पादचारी, वाहने येत असतात. या गर्दीच्या भागात हनुमंत पष्टे यांनी वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केली. वेगात असलेल्या वाहनाची धडक रिक्षेला बसली तर अपघाताची शक्यता होती.


त्यामुळे पोलिसांनी हनुमंत पष्टे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर