वाहतुकीला अडथळा आणणाऱ्या रिक्षाचालकांवर गुन्हे

डोंबिवली  : शहरातील पश्चिम रेल्वेस्थानक भागात वर्दळीच्या रस्त्यावर रिक्षा उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या दोन रिक्षाचालकांवर विष्णुनगर पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. विष्णुनगर पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीराम मिसाळ, आंबिवले, अंकुलकर रेल्वेस्थानक परिसरात गस्त घालत असताना रिक्षाचालक राहुल कुमरे हा रिक्षा वाहनतळ सोडून महात्मा गांधी रस्त्यावरील रसरंजन हॉटेलसमोर प्रवासी वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने रिक्षा उभी करून होता.


रस्त्यात रिक्षा उभी केल्याने पादचारी, वाहतुकीला अडथळा येत होता. गस्तीवरील पोलिसांनी रिक्षाचालक राहुल कुमरे यास नियमबाह्य पद्धतीने रिक्षा रस्त्यावर उभी केल्याचे सांगितले. यामुळे अपघात होण्याची, वाहतुकीला अडथळा होत असल्याची कारणे देत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.



दुसऱ्या घटनेत हनुमंत दत्तात्रय पष्टे हे रिक्षाचालक डोंबिवली पश्चिमेतील सर्वाधिक वर्दळीच्या विष्णुनगर मासळी बाजाराच्या ठिकाणी रिक्षा वाहनतळ सोडून प्रवासी वाहतुकीसाठी उभे होते. ते गणेशनगर भागात राहतात.


विष्णुनगर मासळी बाजार भागात रेल्वेस्थानकातून बाहेर येणारे प्रवासी, महात्मा गांधी रस्ता, कोपर उड्डाणपूल, गुप्ते रस्ता भागातून पादचारी, वाहने येत असतात. या गर्दीच्या भागात हनुमंत पष्टे यांनी वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने रिक्षा उभी केली. वेगात असलेल्या वाहनाची धडक रिक्षेला बसली तर अपघाताची शक्यता होती.


त्यामुळे पोलिसांनी हनुमंत पष्टे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये