Phir Hera Pheri 3 : ये बाबुराव का स्टाइल है... अखेर ‘बाबू भैय्या’चं 'Phir Hera Pheri 3' मध्ये दणक्यात पुनरागमन!

अक्षय कुमार-प्रियदर्शन बरोबरच्या वादावर पडदा


मुंबई : परेश रावल यांनी हेरा फेरी ३ चा वाद संपुष्टात आणत या चित्रपटात परतण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. काही दिवसांपूर्वी मतभेदांमुळे परेश रावल यांनी हेरा फेरी ३ हा चित्रपट सोडला होता.ज्यामुळे चाहते निराश झाले होते. पण,आता या चित्रपटात परतण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, सर्वांनी एकत्र येऊन कठोर परिश्रम करावे अशी आपली इच्छा आहे. परेश रावल यांना एका पॉडकास्टमध्ये हेरा फेरी ३ शी संबंधित वादाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.



या वादावर काय म्हणाले परेश रावल?


परेश रावल यांनी त्याला उत्तर देताना म्हटलंय, 'नाही, कोणताही वाद नाही. मला वाटते की, जेव्हा प्रेक्षकांना एखादी गोष्ट खूप आवडते तेव्हा तुम्ही जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रेक्षकांप्रती आपल्या काही जबाबदाऱ्या असतात. प्रेक्षकांनी तुमचे खूप कौतुक केले आहे. तुम्ही गोष्टी हलक्यात घेऊ शकत नाही. कठोर परिश्रम करून त्या द्या. शेवटीप्रत्येकजण खूप सर्जनशील आहे. मग तो प्रियदर्शन असो, अक्षय कुमार असो किंवा सुनील शेट्टी असो. ते माझे वर्षानुवर्षे मित्र आहेत.' परेश रावल हेरा फेरी ३ चा भाग होते. पण त्यांनी अचानक एका मुलाखतीत चित्रपट सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार करत आहे. अशा परिस्थितीत परेश रावल अचानक चित्रपट सोडल्याची बातमी आल्यानंतर अभिनेत्याच्या टीमने त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली. अक्षयच्या वकीलांनी सांगितले होते की, निर्मिती कंपनीने चित्रपटावर खूप पैसे खर्च केले आहेत. त्यामुळे या प्रकरणात कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.




 

‘हेरा फेरी ३’ बद्दलचा वाद काय होता?


परेश रावल यांच्या या संभाषणातून हे स्पष्ट होते की हेरा फेरी ३ बद्दल सुरू असलेला जो काही वाद अखेर मिटला आहे. यासोबतच, चित्रपटातील बाबू भैयाच्या भूमिकेच्या पुनरागमनाबद्दल एक संकेत देखील मिळाला आहे. आता निर्माते हेरा फेरी ३ मध्ये परेश रावलच्या पुनरागमनाला अधिकृतपणे कधी पुष्टी देतात हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच, यापूर्वी परेश रावल यांनी स्वतः हेरा फेरी ३ सोडल्याची पुष्टी केली होती. तसेच, ११ लाख रुपयांची साइनिंग रक्कम १५% व्याजासह निर्मात्यांना परत करण्यात आली आहे. आता त्यांच्या पुनरागमनामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

Comments
Add Comment

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Itha Movie : 'इठा' चित्रपटात मूळ इतिहासाची तोडफोड; विठाबाई यांच्या कुटुंबियांकडून गंभीर आरोप

पुणे : तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगांवकर ( Itha Movie) यांनी आपल्या अद्वितीय कलेच्या जोरावर महाराष्ट्राच्या

Eetha Movie Release : यशच्या 'टॉक्सिक'नंतर श्रद्धा कपूरच्या 'ईठा'च्या रिलीजबाबत मोठा निर्णय?

मुंबई : 'केजीएफ' (KGF) स्टार यश (Yash) याच्या बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक : अ फेरीटेल फॉर ग्रोन अप्स' (Toxic: A Fairy Tale for Grown-Ups) या चित्रपटाची

Marathi Actors Divorce : मराठी मनोरंजन विश्वाला धक्का! आदिनाथ-उर्मिला यांनी अधिकृतपणे जाहीर केला घटस्फोट

मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोडी अभिनेता आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) आणि अभिनेत्री उर्मिला

Mahaprabhu Jagannath : 'तुमच्या मुलांना हा चित्रपट नक्की दाखवा': बाबा रामदेव यांचे ‘महाप्रभू जगन्नाथ’ला समर्थन; 17 जुलै रोजी देशभर प्रदर्शित होणार

रथयात्रेपूर्वी ‘महाप्रभू जगन्नाथ’च्या निर्मात्यांनी योगगुरू बाबा रामदेव यांचे घेतले आशीर्वाद; 17 जुलै रोजी