बदलापूरची जांभळे लंडनच्या बाजारपेठेत दाखल

बदलापूर : देशातील पहिले भौगोलिक मानांकन मिळालेली बदलापुरातील जांभळे आता देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाली आहेत. औषधी गुण असणाऱ्या आणि रसरशीत जांभळाची चव आता लंडनमधील नागरिक घेणार आहेत. देशातील विविध भागातून परदेशात निर्यात झालेल्या जांभळांमध्ये बदलापूरच्या जांभळांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे भविष्यात मागणी वाढल्यास बदलापुरातील शेतकरी समृद्ध होणार आहे.


ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरात भाभा अनुसंशोधन केंद्राच्या माध्यमातून जांभुळाचे संशोधन करण्यात आले होते. या संशोधनातून बदलापुरात आढळणाऱ्या जांभूळ फळांमध्ये मधुमेह या आजाराशी लढणाऱ्या तत्त्वांचा समावेश आहे. त्यामुळे बदलापुरातील जांभळाला भौगोलिक मानांकन मिळाले.


मागील दोन वर्षांत बदलापुरातील जांभूळ हे आंतरराज्य स्तरावर विक्रीस पाठवण्यात आले; मात्र यावर्षी या फळाने देशाची सीमा ओलांडून लंडनच्या बाजारपेठेत आपले स्थान भक्कम केले आहे. यंदा पहिल्यांदाच बदलापुरातून १० किलो जांभूळ हे लंडनच्या बाजारपेठेत दाखल झाले आहेत. तसे पाहिले तर जांभूळ या फळाला, शेल्फ लाइफ कमी असते. हे फळ झाडावरून तोडल्यानंतर चार ते पाच दिवसांत संपवणे गरजेचे असते. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर यंदा निर्यात केली आहेत. भविष्यात या जांभळांना मागणी वाढली, तर बदलापुरातील हजारो शेतकऱ्यांना रोजगार मिळणार आहे.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या