पहिल्या यादीत ६ लाख ३२ हजार विद्यार्थ्यांचा अकरावीत प्रवेश

मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटला तरीही राज्यातील विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश मिळाला नव्हता. यामुळे राज्यातील विद्यार्थी व पालकांकडून संताप व्यक्त केला जात होता. राज्याच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने राबवली जात असलेली ही अकरावी प्रवेश प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलली जात होती.


ढकलेल्या वेळापत्रकानुसार सोमवारी ही यादी जाहीर होणार होती. अखेर काम पूर्ण झाल्याने ही यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश यादीत राज्यातील ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. यामध्ये कला शाखेच्या १ लाख ४९ हजार ७९१विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या ३ लाख ४२ हजार ८०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सोमवारपासून ते ७ जुलैपर्यंत प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात प्रत्यक्ष जाऊन प्रवेश घ्यावा लागणार आहे.


या यादीत सर्वाधिक पहिल्या पसंतीच्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून ४ लाख ५७ हजार ८४१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे. दुसऱ्या पसंतीचे ७७ हजार ०९९, तिसऱ्या पसंतीचे ३६ हजार ९०१ मिळाले आहेत. तर अर्ज केलेल्या १० लाख ६६ हजार विद्यार्थ्यांच्यापैकी अजूनही तब्बल ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहेत. या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पहावी लागणार आहे.


१२ लाख ७१ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे जाहीर केले असले तरी या यादीत १० लाख ६६ हजार ५ विद्यार्थ्यांचा समावेश केला आहे. यामध्ये सर्वाधिक ६ लाख ९ हजार ७१८ विद्यार्थ्यांचे अर्ज विज्ञान शाखेसाठी आले आहेत.


तर कला शाखेसाठी २ लाख ३१हजार ३५६ आणि वाणिज्य शाखेसाठी २ लाख २४ हजार ९३१ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या अर्जांपैकी एकूण ६ लाख ३२ हजार १९४ विद्यार्थ्यांना पहिल्या यादीत प्रवेश मिळाला आहे. विज्ञान शाखेतून ३ लाख ४२ हजार ८०१, कला शाखेमध्ये १ लाख ४९ हजार ७९१, तर वाणिज्यमध्ये १ लाख ३९ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे. अजूनही राज्यातील ४ लाख ३३ हजार ८११ विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. यामध्ये २.६६ लाख विद्यार्थी विज्ञान शाखेतील सर्वधिक आहेत. या विद्यार्थ्यांना अकरावीच्या पुढील फेऱ्यात प्रवेशाची वाट पहावी लागणार आहे.

Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule : खाण परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे

 परवानगी नियमात आवश्यक ते बदल करणार; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय मुंबई : राज्यभरात मोठ्या

Sunil Tatkare : महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर विविध कार्यक्रमांनी साजरी करणार - सुनिल तटकरे

मुंबई : क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची २०० वी जयंती व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमा निश्चित करा!

 महसूलमंत्री बावनकुळे यांचे आदेश; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती, तीन महिन्यात अहवाल सादर

Chandrashekhar Bawankule : अवैध मुरुम उत्खनन दोषी अधिकाऱ्यांचीनंतरच बडतर्फी

 सोलापूरमधील चिंचोली एमआयडीसीमधील प्रकार  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आदेश  २०० कोटींच्या दंड

Raigad News : रायगड जिल्ह्यात नियम पूर्तता करणाऱ्या दगडखाणींना उत्खननाची परवानगी: महसूल मंत्री

मुंबई :  आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या खाणींना सरसकट बंदी न घालता उत्खननासाठी परवानगी द्यावी, मात्र

Deputy Collectors : राज्यातील ५१ तहसीलदार होणार उपजिल्हाधिकारी

महसूल विभागात हालचाली; 'एमपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी हुकणार? मुंबई :