Municipal school : ठाण्यात फक्त ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम...

ठाणे :  गेला अनेक वर्षांपासून पालिका शाळेत मख्याध्यापकांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे पालिकेतील शाळेत उपशिक्षकांना पदोन्नती देण्यास सुरवात केली. मात्र  मे महिन्यात काही उपशिक्षक सेवानिवृत्त झाल्याने इतर शाळेतील मुख्याध्यापकांची पदे रिक्त झाली आहेत. उर्दूमध्ये सुमारे १० आणि हिंदी माध्यमात साधारणपणे ४ मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती मिळाली आहे. उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका शाळेतील पट १०० ते १५० आहे, त्या ठिकाणी मुख्यध्यापकांची निवड करण्यात आली. अशी माहिती उपायुक्त सचिन सांगळे यांनी दिली.


पालिका सेवेतील मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालिका शाळेती शिक्षकांचादेखील समावेश आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची कमतरता भासू लागली. ठाणे महापालिकेच्या मराठी, इंग्रजी, गुजराती, उर्दू, अशा विविध माध्यमांच्या शाळा आहेत. या शाळेमध्ये मुख्याध्यापकांची निवड होणे आवश्यक आहे पण गेला दोन वर्षांपासून मुख्याध्यापकांची पदे भरली गेली नाहीत.


त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे अनेक मुख्याध्यापक दोन ते तीन वर्ग  सांभाळताना दिसत आहेत. मे महिन्याच्या अखेर प्राथमिक माध्यमातून उप शिक्षकांना मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. त्यानुसार ३८ मराठी शाळांना मुख्याध्यापक देण्यात आले आहेत. परंतु यातील चार ते पाच उपशिक्षक हे मेअखेर सेवानिवृत्त होत असताना त्यांनादेखील पदोन्नती देण्यात आली. त्‍यामुळे काही शाळेतील पदे पुन्हा रिक्त झाली आहेत. दुसरीकडे उर्दूमध्ये सुमारे १० आणि हिंदी माध्यमात सुमारे चार मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Comments
Add Comment

UPI UPDATE : UPI वरून 'Collect Request' बंद ,जाणून घ्या नवीन नियम !

मुंबई : UPI वापरकर्त्यांसाठी एका महत्वाची बातमी आहे. जर तुम्ही Google Pay, PhonePe, Paytm किंवा इतर कोणतेही UPI ॲप वापरत असाल, तर हे

'ठाकरे ब्रँड'ची भीती की नवी खेळी? शिंदे गटाचा ६० सेकंदाचा टीझर काय सांगतोय?

मुंबई: दसऱ्याचं वातावरण असलं तरी महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सभांचा आणि टीझर्सचा धडाका सुरू आहे.

शेतकऱ्यांची सेवा हाच दसरा मेळावा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवसेना यंदा दसऱ्यानिमित्त बांधणार पूरग्रस्तांच्या मदतीचे तोरण मेळावा घेऊन परंपरा अबाधित ठेवणार, मदत देऊन

मागील दोन वर्षापेक्षा धरण क्षेत्रात कमी साठा, पण वर्षभराची तहान भागणार....

मुंबई (सचिन धानजी) : मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी जो पाणीसाठा आवश्यक असतो, तो साठा १ऑक्टोबर रोजी

कांदिवली आगीत सहा महिलांचा मृत्यू

मुंबई (प्रतिनिधी): कांदिवली येथील केटरिंग किचनला लागलेल्या आगीत गंभीर जखमी झालेल्या सर्व सहा महिलांचा मृत्यू

ओला, उबर चालकांचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई : ओला, उबर, रॅपिडो या ॲपआधारित कॅब अथवा बाईक सेवा देणाऱ्या चालकांना योग्य दर मिळावेत यासाठी मागील काही