Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यात पुरीचे डीएम आणि एसपी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ४:३० वाजता श्री गुंडीचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ भक्तांची माफी मागितली आहे.  "हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 



एसपी-डीएमची बदली


प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेतील अनेक मोठ्या त्रुटी लक्षात घेता, पुरीचे एसपी विनीत अग्रवाल आणि डीएम सिद्धार्थ शंकर स्वैन यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. आता पुरीचे नवे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा असतील, जे सध्या एडीजी क्राइम पदावर आहेत. ते यापूर्वी पुरीचे एसपी देखील होते. त्याच वेळी, खुर्दाचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरीचे डीसीपी विष्णू पती आणि कमांडंर अजय पाधी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही जारी केले आहेत, या दोघांनी सुरक्षिततेत 'अक्षम्य निष्काळजीपणा' दाखवला असल्याचे म्हटले आहे.



मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुख्यमंत्री माझी यांनी या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, जी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली केली जाईल. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ रथावर विराजमान होते, तेव्हा हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी मंदिरासमोर जमले होते. अशावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले. दरम्यान धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 

Comments
Add Comment

प्रवाशांना विमान रद्दीकरणाची पूर्ण परतफेड मिळणार! इंडिगोचा महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंडिगो विमान कंपनीला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. चेक-इन प्रणालीत

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा