Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

  66

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यात पुरीचे डीएम आणि एसपी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ४:३० वाजता श्री गुंडीचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ भक्तांची माफी मागितली आहे.  "हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 



एसपी-डीएमची बदली


प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेतील अनेक मोठ्या त्रुटी लक्षात घेता, पुरीचे एसपी विनीत अग्रवाल आणि डीएम सिद्धार्थ शंकर स्वैन यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. आता पुरीचे नवे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा असतील, जे सध्या एडीजी क्राइम पदावर आहेत. ते यापूर्वी पुरीचे एसपी देखील होते. त्याच वेळी, खुर्दाचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरीचे डीसीपी विष्णू पती आणि कमांडंर अजय पाधी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही जारी केले आहेत, या दोघांनी सुरक्षिततेत 'अक्षम्य निष्काळजीपणा' दाखवला असल्याचे म्हटले आहे.



मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुख्यमंत्री माझी यांनी या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, जी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली केली जाईल. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ रथावर विराजमान होते, तेव्हा हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी मंदिरासमोर जमले होते. अशावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले. दरम्यान धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 

Comments
Add Comment

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये

India Post: ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिकेला जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित, भारतीय टपालची घोषणा

नवी दिल्ली:  ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या ५० टॅरिफच्या निर्णयानंतर भारतीय टपाल (India Post) ने अमेरिकेकडे जाणारी

भारत-पाकिस्तानची हवाई क्षेत्रं २४ सप्टेंबरपर्यंत एकमेकांसाठी बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, दोन्ही देशांनी एकमेकांच्या विमानांसाठी

कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरुंचे निधन

मऊ : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचे अपघाती निधन झाले. ते मऊ कुशीनगर,