Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यात पुरीचे डीएम आणि एसपी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ४:३० वाजता श्री गुंडीचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ भक्तांची माफी मागितली आहे.  "हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 



एसपी-डीएमची बदली


प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेतील अनेक मोठ्या त्रुटी लक्षात घेता, पुरीचे एसपी विनीत अग्रवाल आणि डीएम सिद्धार्थ शंकर स्वैन यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. आता पुरीचे नवे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा असतील, जे सध्या एडीजी क्राइम पदावर आहेत. ते यापूर्वी पुरीचे एसपी देखील होते. त्याच वेळी, खुर्दाचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरीचे डीसीपी विष्णू पती आणि कमांडंर अजय पाधी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही जारी केले आहेत, या दोघांनी सुरक्षिततेत 'अक्षम्य निष्काळजीपणा' दाखवला असल्याचे म्हटले आहे.



मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुख्यमंत्री माझी यांनी या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, जी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली केली जाईल. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ रथावर विराजमान होते, तेव्हा हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी मंदिरासमोर जमले होते. अशावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले. दरम्यान धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या अर्णव महर्षीसह देशातील वीस मुलांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील वीस मुलांना

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील कारची डीएसपींना धडक

पाटणा : बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक घटना घडली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ताफ्यातील एका

राष्ट्रपती मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाणबुडीतून प्रवास करणार आहेत. नियोजीत कार्यक्रमानुसार राष्ट्रपती

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले