Jagannath Yatra Stampede: डीएम-एसपींची बदली, दोन अधिकारी निलंबित...चेंगराचेंगरीत झालेल्या ३ मृत्यूंबाबत ओडिशा सरकारची मोठी कारवाई

ओडिशा: भगवान जगन्नाथ यांच्या रथयात्रेदरम्यान पुरीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीची गंभीर दखल घेत, ओडिशा सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. ज्यात पुरीचे डीएम आणि एसपी यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. रविवारी पहाटे ४:३० वाजता श्री गुंडीचा मंदिरासमोर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांची प्रचंड गर्दी झाली आणि त्यात भीषण चेंगराचेंगरीची घटना घडली. या चेंगराचेंगरीत तीन भाविकांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोकं जखमी झाले. या घटनेनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आपत्कालीन बैठक बोलावली. तसेच या घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी जगन्नाथ भक्तांची माफी मागितली आहे.  "हा निष्काळजीपणा अक्षम्य आहे आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल." असे आश्वासन देखील त्यांनी दिले. 



एसपी-डीएमची बदली


प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या चेंगराचेंगरीची गांभीर्याने दखल घेण्यात आली आहे. यात्रेदरम्यान सुरक्षेतील अनेक मोठ्या त्रुटी लक्षात घेता, पुरीचे एसपी विनीत अग्रवाल आणि डीएम सिद्धार्थ शंकर स्वैन यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. आता पुरीचे नवे पोलिस अधीक्षक पिनाक मिश्रा असतील, जे सध्या एडीजी क्राइम पदावर आहेत. ते यापूर्वी पुरीचे एसपी देखील होते. त्याच वेळी, खुर्दाचे जिल्हाधिकारी चंचल राणा यांची पुरीचे नवे डीएम म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पुरीचे डीसीपी विष्णू पती आणि कमांडंर अजय पाधी या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेशही जारी केले आहेत, या दोघांनी सुरक्षिततेत 'अक्षम्य निष्काळजीपणा' दाखवला असल्याचे म्हटले आहे.



मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत


मुख्यमंत्री माझी यांनी या प्रकरणाची प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेशही दिले आहेत, जी विकास आयुक्तांच्या देखरेखीखाली केली जाईल. सरकारने मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली आहे. जेव्हा भगवान जगन्नाथ रथावर विराजमान होते, तेव्हा हजारो भाविक त्यांच्या दर्शनासाठी मंदिरासमोर जमले होते. अशावेळी सुरक्षिततेसाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना गर्दी नियंत्रित करणे कठीण झाले. दरम्यान धक्काबुक्की झाली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. 

Comments
Add Comment

पाकिस्तान-अफगाणिस्तानात तणाव असतानाच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू घेणार राफेलमधून झेप!

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, म्हणजेच २९ ऑक्टोबर २०२५ रोजी, हरियाणातील अंबाला हवाई दल

पाकिस्तान–अफगाणिस्तान तणाव पुन्हा वाढला: तालिबानकडून इस्लामाबादवर हल्ल्याची तयारी

Pakistan Afghan War : पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संबंध पुन्हा एकदा धोक्याच्या टप्प्यावर पोहोचले आहेत. काही दिवसांपूर्वी

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 'बंपर' भेट!; ८वा वेतन आयोग अखेर मंजूर; 'या' तारखेपासून होणार लागू, किमान वेतनात होणार 'इतकी' वाढ!

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अखेर आज ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली आहे. यामुळे ५० लाख केंद्रीय सरकारी कर्मचारी

दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात; एअर इंडियाच्या बसला आग

नवी दिल्ली : दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल ३ वर मोठा अपघात झाला. टर्मिनल ३ वर एअर इंडियाच्या बसला आग लागली. सुदैवाने

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या