...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

  74

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर सलग दुसरा विजय मिळवून इंग्लंड आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर झाला असला तरी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला खेळवणार की त्याला विश्रांती देणार यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. यामुळे पिछाडीवर असलेला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी बुमराहला संघात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी मालिका सुरू होण्यापूर्वीच पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या कसोटीत बुमराह उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले होते. यामुळे बुमराहला खरंच विश्रांतीची आवश्यकता आहे का आणि त्यामुळे फायदा होईल की तोटा यावरुन चर्ता सुरू आहे.

जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ४१०.४ षटके टाकली आहेत. जी क्रिकेट विश्वातील कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा जास्त आहेत. बुमराहने या काळात कसोटी क्रिकेटमध्ये ७८ बळी घेतले आहेत. बुमराह भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. याआधी २०२० - २१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बुमराह सलग पाच कसोटी सामने खेळला. कसोटीत सतत वेगवान गोलंदाजी केल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. हा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाच पैकी तीन कसोटीतच बुमराहला खेळवण्याचे नियोजन भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे.
Comments
Add Comment

Pujara Retirement : टीम इंडियामधून ९ महिन्यांत ४ दिग्गजांनी घेतली निवृत्ती

मुंबई: भारतीय क्रिकेट संघात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची त्सुनामी आल्याचे चित्र आहे. गेल्या ९

Virat Kohli Comeback: विराट कोहली धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज! लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर सराव करताना दिसला

लॉर्ड्स : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL)

भारत-पाकिस्तान सामन्यांबाबत भारत सरकारची कठोर पाऊले, आशिया कपबद्दलही महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: भारत सरकारने भारत-पाकिस्तान क्रीडा सामन्यांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये

Bronco Test काय आहे? भारतीय क्रिकेटपटूंना फिटनेसाठी आता द्यावी लागणार ही टेस्ट

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटमध्ये फिटनेसबाबत मोठा बदल करण्यात आला आहे. टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांसाठी आता

दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजची पहिल्या स्थानी झेप

नवी दिल्ली : आयसीसीने पुन्हा एकदा क्रमवारी जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात एकही कसोटी सामना झाला नाही, त्यामुळे

ICC Rankings : आयसीसीच्या एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीतून रोहित-विराटची नावे गायब

दुबई : भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीची नावे आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतून गायब