...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून जिंकला. मालिकेतील दुसरा सामना २ जुलैपासून बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा भारताचा प्रयत्न असेल तर सलग दुसरा विजय मिळवून इंग्लंड आघाडी वाढवण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर झाला असला तरी भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. टीम इंडिया दुसऱ्या कसोटीत जसप्रीत बुमराहला खेळवणार की त्याला विश्रांती देणार यावरुन तर्कवितर्क सुरू आहेत.

इंग्लंडने दुसऱ्या कसोटीसाठी जोफ्रा आर्चर या वेगवान गोलंदाजाचा संघात समावेश केला आहे. यामुळे पिछाडीवर असलेला भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत स्वतःची बाजू भक्कम करण्यासाठी बुमराहला संघात घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे. याआधी मालिका सुरू होण्यापूर्वीच पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या कसोटीत बुमराह उपलब्ध असेल असे जाहीर करण्यात आले होते. यामुळे बुमराहला खरंच विश्रांतीची आवश्यकता आहे का आणि त्यामुळे फायदा होईल की तोटा यावरुन चर्ता सुरू आहे.

जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये १ जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत ४१०.४ षटके टाकली आहेत. जी क्रिकेट विश्वातील कोणत्याही वेगवान गोलंदाजापेक्षा जास्त आहेत. बुमराहने या काळात कसोटी क्रिकेटमध्ये ७८ बळी घेतले आहेत. बुमराह भारतीय गोलंदाजीचा आधारस्तंभ आहे. याआधी २०२० - २१ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध बुमराह सलग पाच कसोटी सामने खेळला. कसोटीत सतत वेगवान गोलंदाजी केल्यामुळे त्याला दुखापत झाली होती. हा प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पाच पैकी तीन कसोटीतच बुमराहला खेळवण्याचे नियोजन भारतीय संघ व्यवस्थापन करत आहे.
Comments
Add Comment

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

जोकोविचला नमवत कार्लोसची ऑस्ट्रेलियन ओपनला गवसणी

मेलबर्न : ऑस्ट्रेलियन ओपन २०२६च्या पुरुष एकेरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेनच्या युवा खेळाडू कार्लोस