कंत्राटदारांपुढे महापालिका हतबल!

पुन्हा उघडल्या ठोक रकमेच्या निविदा


विरार : वसई-विरार महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापनाची सर्व कामे यापुढे परिमाण उत्पादन तत्त्वावर (क्वांटिटी आऊट पुट) कार्यपद्धतीने देण्याचा महापालिका प्रशासनाने घेतलेला निर्णय महापालिकेला लवकरच फिरवावा लागला आहे. ही सर्व कामे ठोक (लम्पसम)पद्धतीनेच करण्यास कंत्राटदारांची समर्थता असल्यामुळे महानगर पालिकेने कंत्राटदाराच्या भूमिकेला झुकते माप दिले असून, पुन्हा एकदा घनकचरा व्यवस्थापनाची निविदा प्रक्रिया ठोक स्वरूपात काम देण्याच्या पद्धतीनेच राबविण्यात येत आहे. महानगरपालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, आणि वर्गीकृत तसेच विलगीकृत कचरा संकलन करणे त्याचप्रमाणे क्षेपण भूमीवर वाहतूक करणे या कामासाठी तीन वर्षांकरिता निविदा प्रक्रिया २०२४च्या अखेरीस राबविण्यात आलेली आहे . यावेळी पहिल्यांदाच मनुष्यबळ पुरवठा व यंत्रसामुग्री पुरवठा याप्रमाणे सरसकट एकरकमी निविदा न मागविता, दैनंदिन रस्ते सफाई आणि उघडी गटारे सफाई प्रति किलोमीटर याप्रमाणे तर बंदिस्त गटारावरील चेंबर्स प्रती चेंबरनुसार साफ करणे आणि वर्गीकृत व विलगीकृत कचरा संकलन करून प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहून नेण्यासाठी प्रतिटन याप्रमाणे निविदा मागविण्यात आली होती. सन २०२५-२६, २०२६-२७, आणि २०२७-२८ या तीन वर्षाकरिता राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेमध्ये मे. दिनेश बी संख्ये , मे. हेना इंटरप्राइजेस, मे. नितीन बनसोड, रिलायबल एजन्सीज, मे. साई गणेश इंटरप्राईजेस, शिवम इंटरप्राईजेस, श्री अनंत इंटरप्राईजेस आणि मे. उजाला लेबर कॉन्ट्रॅक्टर हे कंत्राटदार महापालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीने छाननी करून पात्र ठरवले होते. कंत्राटदारांनी काम करण्यासाठी दिलेले दर महानगरपालिकेला मान्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदार, महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेने नेमलेल्या तांत्रिक सल्लागार मे. टंडन अर्बन सोल्युशस प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये कंत्राटासाठी वाटाघाटी करिता बैठका घेण्यात आल्या.परंतु या बैठकांमध्ये योग्य तोडगा निघाला नाही. त्यामुळे महानगरपालिकेने संपूर्ण निविदा प्रक्रियाच रद्द केली.


महापालिका प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात संबंधित कंत्राटदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती देण्यात न आल्यामुळे महानगरपालिकेने नवीन निविदा प्रक्रिया मे २०२५ पासून सुरू केली आहे. दरम्यान, किलोमीटर प्रमाणे रस्त्यांची सफाई, चेंबरची मोजदाद करून बंदिस्त गटारावरील चेंबर्सची सफाई, ओपन गटारांची किलोमीटर नुसार सफाई आणि आणि प्रतिटन प्रमाणे कचऱ्याचे संकलन व वाहतूक याप्रमाणे महापालिकेच्या निविदेतील अटी व शर्ती मान्य न करता, जशा पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाचे काम केल्या जात आहे.


त्याच पद्धतीने काम करण्याची तयारी पहिल्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांनी वाटाघाटी दरम्यान दाखवली. मात्र कंत्राटदारांना अशा पद्धतीने काम दिल्यास, महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी प्रसिद्ध केलेल्या निविदेच्या मूळ उद्देशाला बाधा पोहोचणार तसेच भविष्यात लेखापरीक्षण महालेखा परीक्षक यांचेकडून लेखा आक्षेप उपस्थित होतील ही शक्यता गृहीत धरून पालिकेने पूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केली. आणि नवीन निविदा प्रक्रिया मात्र पूर्वीप्रमाणेच ठोक पद्धतीने काम देण्याच्या स्वरूपाची राबविली जात आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाच्या भूमिकेबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना