Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे वाढणार आहेत. महामेट्रो प्रशासनाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.


पुणेकरांसाठी यामध्ये एकूण १०२ कोच दररोज प्रवासी सेवा पुरवत आहेत. आता आणखी ४५ डबे वाढल्याने एकूण डब्यांची संख्या १४७ पर्यंत पोहचणार आहे. ट्रेनच्या या विस्तारामुळे पुणेकरांना मेट्रोतून प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार नाही आणि प्रवासाचा वेळही वाचेल, अशी आशा आहे. नवीन मार्गांवर काम पूर्ण झाल्यावर या ट्रेन सेवेत दाखल होतील, यामुळे मेट्रोचे जाळे अधिक मजबूत होईल.






  • सध्याच्या ट्रेन - ३४

  • सध्याचे कोच - १०२

  • वीन खरेदी केल्या जाणार्‍या ट्रेन - १५

  • नवीन वाढणारे कोच - ४५

  • एकूण ट्रेन (भविष्यात)- ४९

  • एकूण कोच (भविष्यात) - १४७

  • सध्याचे दैनंदिन प्रवासी - १ लाख ७० हजार

  • एकूण नियोजित दैनंदिन प्रवासी उद्दिष्ट - साडे-तीन लाखांपर्यंत



मेट्रोची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. फीडर सेवेच्या माध्यमातून आम्ही मेट्रोचे प्रवासी वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. सध्या आमचे दैनंदिन प्रवासी एक लाख ७० हजारांच्या घरात आहेत. त्यांच्याकरिता सध्या ३४ ट्रेनद्वारे प्रवासी सेवा पुरवली जात आहे. नुकत्याच दोन नव्या मार्गांना केंद्राकडून मान्यता मिळाली आहे. यामुळे आम्हाला आणखी नव्या ट्रेनची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी आणखी १५ ट्रेन उपलब्ध होणार आहेत. एक ट्रेन, तीन कोचची असणार असून, या १५ नव्या ट्रेनमुळे आगामी काळात मेट्रोच्या ताफ्यात ४५ डबे वाढतील असं महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनावणे यांनी म्हटलंय.


ही खूपच आनंदाची बातमी आहे. सध्याच्या ट्रेनमध्ये विशेषतः पिक अवर्समध्ये खूप गर्दी असते. नवीन ट्रेनमुळे गर्दी नक्कीच कमी होईल. अन् आमच्यासारख्या प्रवाशांचा अनुभव निश्चितच चांगला होईल असं एक प्रवासी कुणाल चव्हाण यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे