मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्यांचे खोल समुद्रात होणार विसर्जन

पीओपीवरील बंदी उठवल्यानंतर मंडळांना मिळणार दिलासा


मुंबई : ‘पीओपी’वरील बंदी उठवल्यानंतर आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपीच्या गणेशमुर्त्या खोल समुद्रात विसर्जन करण्याचा मार्गही खुला होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता.२७) सह्याद्री अतिथीगृहावर याबाबतच्या बैठकीत धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी दिले.


‘पीओपी’वर बंदी आल्यामुळे राज्यातील मूर्तिकार आणि त्यावर विसंबून असणारे सर्व घटक यांचा रोजगार धोक्यात आला होता. याप्रकरणी सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी पुढाकार घेतला. त्यातच न्यायालयाने ‘पीओपी’वरील बंदी उठली आहे. मात्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या पीओपी गणेशमुर्त्या विसर्जन करण्याबाबत सरकारला आपली भूमिका न्यायालयात मांडत आहे.


याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीला मंत्री शेलार यांच्यासह नगर विकास, पर्यावरण, नगरपालिका, महापालिका, यासंबंधीत प्रशासकीय अधिकारी आणि राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आदी मान्यवर उपस्थित होते.


पीओपी आणि नैसर्गिक जलस्त्रोतांबाबत राष्ट्रीय हरित लवादाने दिलेली मार्गदर्शक तत्वे तसेच न्यायालयाने दिलेले आदेश, डॉ. काकोडकर समितीने केलेला अभ्यास व त्याचा अहवाल यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. डॉ. काकोडकर समितीच्या अभ्यासानुसार, ‘मोठ्या मुर्त्यांचे खोल समुद्रात विसर्जन होऊ शकते, त्यादृष्टीने अभ्यास करणे आवश्यक आहे, याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.


घरगुती गणेशाच्या मूर्ती या कृत्रिम तलावात विसर्जित केल्या जातात तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या मूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत ही राजीव गांधी विज्ञान-तंत्रज्ञान आयोगाने सकारात्मक दिसून येते आहे. तर छोट्या मुर्त्यांनाही समुद्रात विसर्जन करण्याबाबतचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. याबाबत आज झालेल्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली.


सर्वंकष धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मोठ्या मुर्ती खोल समुद्रात विसर्जन करण्याबाबत एक सकारात्मक चर्चा झाली. काकोडकर समितीचा अहवाल, राष्ट्रीय हरित लवादाची मार्गदर्शक सूचना आणि गणेशोत्सवाची प्रथा परंपरा, विसर्जनाची पध्दती याचा विचार करुन एक सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती मंत्री शेलार यांनी दिली.


सरकार मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी
मुंबईच्या गणेशोत्सवाची प्रथा परंपरा आणि त्याचा एक समृद्ध इतिहास त्याच्याशी जोडलेली लोक भावना आणि जगभरात या उत्सवाची असलेली ख्याती याच्यात कोणतेही विघ्न न येता या सगळ्यात सकारात्मक तोडगा निघेल, सरकार पुर्णपणे सकारात्मक आहे, उत्सव आणि मुर्तीकारांच्या खंबीर पाठीशी आहे, असे मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मिठीच्या सफाईची घाई; कंत्राटदारांच्या पाया पडणार की खात्यामार्फत करणार?

मुंबई: मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतील गाळाची सफाई करण्यासाठी आता कंपन्याच पुढे

Bomb Threat : मुंबई प्रेस क्लबला बॉम्बची धमकी; एका ईमेलमुळे खळबळ

- सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर मुंबई : मुंबईत एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुंबई प्रेस क्लबला (Mumbai Press Club) धमकीचा

मुंबई महापालिकेत विरोधकांची हवा गुल... काय आहे कारण जाणून घ्या

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आली असली तरी उबाठा आणि काँग्रेसच्या रुपात सक्षम विरोधी पक्ष असतानाही

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा