मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW) या संस्थेची नवी धुरा आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्याकडे सोपवली गेली आहे. १९८९ बँचचे अधिकारी पराग जैन हे ३० जून २०२५ पासून नवा पदभार स्विकारणार आहेत.


रवी सिन्हा यांच्याबदली आता जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी जैन यांची नियुक्ती सरकारने केली आहे. पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये बौद्धिक क्षमतेचा आधारे गुप्त माहिती गोळा केली होती. त्यांच्या या कामगिरीनंतर आता रॉ ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांनी देशाच्या विविध पातळीवरील सुरक्षा यंत्रणेत काम केले आहे. त्यांचा प्रदिर्घ अनुभव पाहता त्यांची या पदावर वर्णी लागली आहे.


सध्या पराग जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे मुख्य आहेत. मोदी सरकारने त्यांची वर्णी लावली असल्याने सध्याच्या क्लिष्ट जागतिक वातावरणाचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी कॅनडा मधील खलिस्तानी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच जम्मू काश्मीर येथे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केले होते.

Comments
Add Comment

भारताने अमेरिकेनंतर नामिबियालाही हरवले, आता प्रतिक्षा रविवारच्या लढतीची

नवी दिल्ली : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारताने अमेरिकेविरुद्धच्या सामना २९ धावांनी जिंकला. पाठोपाठ

PMO Office Shift: तब्बल ७८ वर्षांनंतर पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार

दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी दुपारी पंतप्रधान कार्यालयचा (पीएमओ)

Uttar Pradesh: तीन बहिणींच्या आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट, पोलिसांनी केला वडिलांचा फोन जप्त

उत्तर प्रदेशा: गाझियाबादमधील एका घराच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करणाऱ्या तीन बहिणींच्या

Bharat Bandh: केंद्रीय कामगार आणि शेतकरी संघटनांचा आज देशव्यापी बंद

मुंबई : विविध कामगार संघटनांनी आज, गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक दिल्याने दैनंदिन व्यवहारांवर

Crime: प्रिन्सिपल सुनेसोबत सासऱ्याचे नको ते प्रकार, नात्याला काळिमा फासणारी घटना समोर

मुंबई: नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात आदराचे स्थान असलेल्या एका प्रतिष्ठित

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी