मोठी बातमी: आयपीएस पराग जैन भारताचे नवे 'RAW' प्रमुख

प्रतिनिधी: भारताची परकीय गुप्तचर संस्था म्हणून जगभरातही ख्याती असलेल्या रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (Research and Analysis Wing (RAW) या संस्थेची नवी धुरा आयपीएस अधिकारी पराग जैन यांच्याकडे सोपवली गेली आहे. १९८९ बँचचे अधिकारी पराग जैन हे ३० जून २०२५ पासून नवा पदभार स्विकारणार आहेत.


रवी सिन्हा यांच्याबदली आता जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रवी सिन्हा यांचा कार्यकाळ ३० जूनला संपत आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांसाठी जैन यांची नियुक्ती सरकारने केली आहे. पराग जैन यांनी ऑपरेशन सिंदूर मध्ये बौद्धिक क्षमतेचा आधारे गुप्त माहिती गोळा केली होती. त्यांच्या या कामगिरीनंतर आता रॉ ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांनी देशाच्या विविध पातळीवरील सुरक्षा यंत्रणेत काम केले आहे. त्यांचा प्रदिर्घ अनुभव पाहता त्यांची या पदावर वर्णी लागली आहे.


सध्या पराग जैन हे एव्हिएशन रिसर्च सेंटरचे मुख्य आहेत. मोदी सरकारने त्यांची वर्णी लावली असल्याने सध्याच्या क्लिष्ट जागतिक वातावरणाचे आव्हान त्यांच्यासमोर उभे आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांनी कॅनडा मधील खलिस्तानी कारवायांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. तसेच जम्मू काश्मीर येथे कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यास प्रयत्न केले होते.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने