Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू


नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये बांधकाम व्यवसायिकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा अपघातात मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी व दोन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय मदत न मिळाल्यामुळे हेकरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सुनील हेकरे आणि त्यांचे कुटुंबीय मुंबईहून नाशिककडे आलिशान मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मात्र, समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याच्या पुढे शहापूर हद्दीत त्यांच्या गाडीला अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीने ३ वेळा पलटी मारली आणि सुनील हेकरे हे गाडीतून बाहेर फेकले गेले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने आणि प्रचंड रक्तस्रावामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.





वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही


सुनील हेकरे यांचे बंधू अनिल हेकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अपघाताच्या ठिकाणी पाणी साचले होते. त्यामुळे गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. "महामार्गावरील बांधकामाची गुणवत्ता निकृष्ट असून, अपघातानंतर वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली नाही," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.



उद्घाटनाच्या महिन्याभरातच अपघातांची मालिका


दरम्यान, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी-आमणे या ७६ किमी लांबीच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत समृद्धी महामार्गावर अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे हा नवा मार्ग हा अपघाती मार्ग ठरतोय का? असा सवाल आता उपस्थित होत आहे. मागील आठवड्यात कसारा-शहापूर तालुक्यातील वाशिंद पोलीस स्टेशनच्या हद्दीत समृद्धी महामार्गावर क्रुझर जीप आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होते. ही दुर्घटना वाशिंद आणि आमने दरम्यान घडली होती.

Comments
Add Comment

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पर्यटक तरुणी ४० फूट खोल दरीत कोसळली

राजगड : राजगडावर पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर अचानक मधमाश्यांनी हल्ला केला. त्यामुळे पर्यटकांची पळापळ झाली.

जमीन मोजणी आता होणार केवळ ३० दिवसांत !

सरकारने अधिसूचना जारी केल्याची महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील जमीन

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू; पहा आपल्या तालुक्यातील शेतक-यांना काय मिळालं?

२५१ तालुके पूर्णतः तर ३१ तालुके अंशतः आपत्तीग्रस्त म्हणून घोषित शेती, घरे, जनावरे, मत्स्यव्यवसाय, पायाभूत सुविधा

Diwali Firecracker Ban 2025 : फटाक्यांशिवाय दिवाळी? पुण्यापाठोपाठ मुंबईतही 'नो क्रॅकर'चा कडक नियम! मुंबईकरांची यंदाची दिवाळी 'शांत'?

मुंबई: "दिवाळीचा सण मोठा, नाही आनंदा तोटा" या उक्तीप्रमाणे अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या दिवाळीमुळे मुंबईतील

Kolhapur Student Assault Video : ‘रँगिंग’च्या नावाखाली दहशत! हाॅस्टेलमध्ये सर्रास 'रॅगिंग' की टोळीयुद्ध? तळसंदे पाठोपाठ पेठवडगावमध्येही विद्यार्थ्यांची अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षण संस्थांमधील खासगी वसतिगृहे (Hostel) आता विद्यार्थ्यांच्या अमानुष

'हंबरडा फोडायची भाषा केली तरी साथ मिळणार नाही': उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा सज्जड इशारा

३२ हजार कोटींच्या मदतीने विरोधकांचे राजकारण हाणून पाडले; 'मुंबई मनपासाठी थोडा हंबरडा शिल्लक ठेवावा' छत्रपती