झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ति पाळत ठेवत होते. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले होते, परंतु चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.



झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की दोन व्यक्ति गेल्या चार दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत आहेत. या संशयास्पद हालचालींची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, ज्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले.


पोलिसांनी रात्रभर या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी केली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची तपासणी केली. परंतु चौकशीत कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.


झिशान सिद्दीकी हे प्रसिद्ध राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

भायखळ्यात इमारत खोदकामादरम्यान माती कोसळली

दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू मुंबई  : भायखळा पश्चिमेकडील हंस रोड परिसरात हबीब मेंशन इमारतीच्या पुनर्विकासाचे

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास