झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ति पाळत ठेवत होते. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले होते, परंतु चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.



झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की दोन व्यक्ति गेल्या चार दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत आहेत. या संशयास्पद हालचालींची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, ज्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले.


पोलिसांनी रात्रभर या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी केली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची तपासणी केली. परंतु चौकशीत कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.


झिशान सिद्दीकी हे प्रसिद्ध राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील

'वन राणी' टॉय ट्रेन पुन्हा सुरू होणार

मुंबई: चार वर्षांच्या खंडानंतर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मिनी टॉय ट्रेन "वन राणी" सप्टेंबरच्या अखेरीस

फडणवीस सरकारचा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश

मुंबई मेट्रो स्टेशनवर आता तुमचा व्यवसाय सुरू करा! काय आहे ही योजना?

मुंबई: मुंबईतील उद्योजक, स्टार्टअप्स आणि व्यावसायिकांसाठी एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महा मुंबई मेट्रोने (MMMOCl)

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारतींसाठी लागू झाले हे बंधन

मुंबई : राज्यातील नगरपरिषदा तसेच नगरपंचायतींच्या प्रशासकीय इमारती आता शासनाने तयार केलेल्या नमुना नकाशानुसारच

पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी जॉय मिनी ट्रेन सुरू करणार

मुंबई : राज्यातील महत्त्वाच्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पर्यटन उपक्रमांना चालना देण्यासाठी शासन प्रयत्न करत