झिशान सिद्दीकी यांच्यावर पाळत ठेवणाऱ्या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन सोडले

  37

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते झिशान सिद्दीकी यांच्यावर गेल्या चार दिवसांपासून दोन अज्ञात व्यक्ति पाळत ठेवत होते. या प्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले होते, परंतु चौकशीनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे.



झिशान सिद्दीकी यांच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आले की दोन व्यक्ति गेल्या चार दिवसांपासून त्यांचा पाठलाग करत आहेत. या संशयास्पद हालचालींची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली, ज्यानंतर निर्मल नगर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्या दोन्ही व्यक्तींना ताब्यात घेतले.


पोलिसांनी रात्रभर या दोन्ही व्यक्तींची कसून चौकशी केली. तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी देखील या प्रकरणाची तपासणी केली. परंतु चौकशीत कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही आणि त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही.


झिशान सिद्दीकी हे प्रसिद्ध राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आहेत. गेल्या वर्षी बाबा सिद्दीकी यांची गोळीबारात हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर झिशान सिद्दीकी यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर पाळत ठेवल्याच्या बातमीने मोठी खळबळ उडाली होती.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरे आणि आव्हाडांच्या भूमिकेवर भाजपचा सवाल

हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये

लोकलमध्येही महिला सुरक्षित नाहीत ! पोलिसानेच केले महिलेसोबत घाणेरडे कृत्य

मुंबई : मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे . सुरक्षेसाठी नेमलेले

मोठी बातमी : आता ‘पॅन २.०’ येणार! जुन्या 'पॅन कार्ड' चे काय होणार?

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांत पॅन २.० सातत्याने चर्चेत आहे. आयकर विभागाने PAN २.०च्या आधुनिकीकरणासाठी मोठं पाऊल

Housing Jihad: धक्कादायक! हिंदूंची घरं मुस्लिमांना देऊन बिल्डरांकडून मुंबईत हाऊसिंग जिहाद

हिंदू दहशतवाद म्हणणाऱ्या काँग्रेसवाल्यांसोबत डिनर करणाऱ्या उबाठावर संजय निरुपम यांचा घणाघात मुंबई: पश्चिम

गणेशभक्तांच्या सोयीसाठी गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत लोकल आणि मेट्रो सुरु ठेवावी: मंत्री मंगलप्रभात लोढा

जनतेच्या मागणीसाठी रेल्वे आणि मेट्रो प्रशासनासोबत पाठपुरावा करणार मुंबई: महाराष्ट्र आणि मुंबई एमएमआर परिसरात

मुंबईत ५१ कबुतरखाने बंद... पक्ष्यांना खायला घालण्यास पूर्णपणे बंदी! आतापर्यंत १०० जणांहून अधिक लोकांना ठोठावला दंड

मुंबई: कबुतरांना खायला देण्यावरील बंदी लागू झाल्यापासून, बीएमसीने दादर कबुतरखान्यात १०० हून अधिक लोकांना दंड