BMC : प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार, इमारतीचा ५० टक्के भाग खुला, मनपाचे नवीन धोरण

मुंबई :  महानगरपालिका शहराच्या विकासासाठी नवीन धोरण तयार करण्याच्या उद्देशाने पाऊल उचलणार असून शहरातील प्रतिष्ठित इमारतींना सौंदर्य बहाल करणार आहे. शहराच्या विकासाला आकार देणे हा त्यामागचा उद्देश आहे.  इमारतींच्या विकासाठी नागरिकांकडून सुचना आणि हरकती मागवण्यात आले आहेत. २०३४ पर्यंत शहाराच्या विकासाला नवीन आकार देण्यासाठी आत्याधुनिक सुविधांचा देखील वापर करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.


नवीन धोरणानुसार इमारतीचा पुनर्बांधणीचा विचार करुनच सौंदर्य बहाल करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे त्यात महापालिका आयुक्त आणि वस्तुकला, दृश्य कला आणि संबंधिक क्षेत्रातील सहा सदस्यांचा समावेश असणार आहे.तसेच समावेश असलेल्या व्यक्तींचे छाननी पुनरावलोकन करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या नवीन धोरणानुसार प्रतिष्ठित इमारतीचा ५० टक्के भाग खुला राहिला पाहिजे. असे नवीन धोरणात नमूद करण्यात येणार आहे.


दरम्यान, या नवीन धोरणामध्ये निवासी इमारतींना सामान्यतः या श्रेणीतून वगळण्यात येणार आहे. यात केवळ अद्वितीय वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या धोरणाचा उद्देश मुंबईच्या विविध स्थापत्य वारशाचे प्रतिबिंबित करणाऱ्या रचनांना प्रोत्साहन देणे हा आहे. ज्यामध्ये व्हिक्टोरियन गॉथिक, आर्ट डेको आणि इंडो-सारसेनिक शैलींचा समावेश आहे. त्यामुळे महापालिकेच्या नवीन  धोरणाला जनतेचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे.






Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य