ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या वर्षभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. एसटीच्या १६ आगारातून ही कारवाई करण्यात आली असून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३१९ इतकी आहे. अशी माहिती समोर आली.


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कशा प्रकारे दंड आकरण्यात येतो 


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई म्हणून तिकिटाच्या रकमेबरोबरच त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. जर प्रवाशांकडे सामान असल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्यात येतो


२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई


भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये


राज्य सरकारने एसटी प्रवाशांनकरीता परवडणारे दर ठेवलेले आहेत. त्यामुळे एसटीचे तिकिट काढूनच प्रवास करावा, एसटी विभागाला प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग अधिकारी अरुण सिया यांनी केले आहे. तसेच एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी आता नियमीत केली जाणार असून त्यात बदल केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचल्याची माहिती एसटी महामंडळ आधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रताप सरनाईक सविस्तर श्वेतपत्रिका काढणार आहेत. त्यात एसटी महामंडळाला किती फायदा आणि नुकसान झाले याची माहिती असणार आहे.


Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस