ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या वर्षभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. एसटीच्या १६ आगारातून ही कारवाई करण्यात आली असून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३१९ इतकी आहे. अशी माहिती समोर आली.


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कशा प्रकारे दंड आकरण्यात येतो 


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई म्हणून तिकिटाच्या रकमेबरोबरच त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. जर प्रवाशांकडे सामान असल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्यात येतो


२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई


भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये


राज्य सरकारने एसटी प्रवाशांनकरीता परवडणारे दर ठेवलेले आहेत. त्यामुळे एसटीचे तिकिट काढूनच प्रवास करावा, एसटी विभागाला प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग अधिकारी अरुण सिया यांनी केले आहे. तसेच एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी आता नियमीत केली जाणार असून त्यात बदल केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचल्याची माहिती एसटी महामंडळ आधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रताप सरनाईक सविस्तर श्वेतपत्रिका काढणार आहेत. त्यात एसटी महामंडळाला किती फायदा आणि नुकसान झाले याची माहिती असणार आहे.


Comments
Add Comment

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

निवडणूक आयोगाने वाढवला निवडणुकीतील खर्चाचा 'कोटा'

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता उमेदवाराने करावयाच्या

शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात काय म्हणाले मंत्री दादाजी भुसे?

मुंबई : शालेय पोषण आहार कामगारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शालेय शिक्षण विभाग सकारात्मक असून त्यांच्या

शेतकरी, पशुपालकांना वीज दरात सवलत मिळणार, पण 'या' अटींवर...

मुंबई : राज्य शासनाने पशुपालन व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता वीजदरात

धक्कादायक! एसटीचे ७ कर्मचारी दारू पिऊन ड्युटीवर!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कारवाईचा बडगा मुंबई : अचानक केलेल्या तपासणीत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन

Tamhini Ghat Accident : 'सनरूफ' ठरला जीवघेणा! ताम्हिणी घाटात दरड कोसळून थरार, सनरुफ तोडून दगड थेट कारमध्ये पडले; महिलेचा जागीच मृत्यू!

पुणे/रायगड : पुणे-मानगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) एक अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी अपघाताची घटना