ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या वर्षभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. एसटीच्या १६ आगारातून ही कारवाई करण्यात आली असून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३१९ इतकी आहे. अशी माहिती समोर आली.


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कशा प्रकारे दंड आकरण्यात येतो 


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई म्हणून तिकिटाच्या रकमेबरोबरच त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. जर प्रवाशांकडे सामान असल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्यात येतो


२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई


भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये


राज्य सरकारने एसटी प्रवाशांनकरीता परवडणारे दर ठेवलेले आहेत. त्यामुळे एसटीचे तिकिट काढूनच प्रवास करावा, एसटी विभागाला प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग अधिकारी अरुण सिया यांनी केले आहे. तसेच एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी आता नियमीत केली जाणार असून त्यात बदल केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचल्याची माहिती एसटी महामंडळ आधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रताप सरनाईक सविस्तर श्वेतपत्रिका काढणार आहेत. त्यात एसटी महामंडळाला किती फायदा आणि नुकसान झाले याची माहिती असणार आहे.


Comments
Add Comment

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

ठाणे पूर्व येथील श्री जय अंबे माता नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली सहकुटुंब देवीची पूजा

ठाणे: चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे

‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार'मुळे भागली ११ हजार गावांची तहान

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; ७७ लाख टँकर क्षमतेचा पाणीसाठा पुनर्संचयित, ७.७३ कोटी घनमीटर गाळ

अभ्यास न झाल्याने विद्यार्थाने चोरली प्रश्नपत्रिका, थेट...

मुंबई: राज्यात दहावी- बारावी बोर्ड परिक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरु असल्याचे समोर येत आहे. एकीकडे

Gudi Padwa 2026 : नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी दिल्या गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गुढीपाडवा व मराठी नवीन वर्षा निमित्त राज्यातील

भविष्य सांगता सांगता जमवली अवाढव्य संपत्ती, अशोक खरातचं साम्राज्य कुठे आणि किती?

अहिल्यानगर: महिलांचे शोषण करणाऱ्या आणि स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात उर्फ कॅप्टन खरात याच्या