ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

  44

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या वर्षभरात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एकूण ३ लाख ७५ हजार रुपये दंड वसूल केला. एसटीच्या १६ आगारातून ही कारवाई करण्यात आली असून विना तिकिट प्रवास करणाऱ्यांची एकूण संख्या ३१९ इतकी आहे. अशी माहिती समोर आली.


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कशा प्रकारे दंड आकरण्यात येतो 


विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई म्हणून तिकिटाच्या रकमेबरोबरच त्याच्या दुप्पट दंडाची रक्कम वसूल केली जाते. त्यावर १८ टक्के जीएसटी लावण्यात येतो. जर प्रवाशांकडे सामान असल्यास स्वतंत्रपणे शुल्क आकारण्यात येतो


२०२४ –२५ मध्ये परिवहन विभागीय कार्यालय पुणे यांच्याकडून वसूल करण्यात आलेली दंडात्मक कारवाई


भाडे वसूली ४६,५५० रुपये,
दंड ८३,१८७ रुपये
इतर वसूली २,१०,४९७ रुपये
एकूण ३,४०,२३४ रुपये


राज्य सरकारने एसटी प्रवाशांनकरीता परवडणारे दर ठेवलेले आहेत. त्यामुळे एसटीचे तिकिट काढूनच प्रवास करावा, एसटी विभागाला प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन विभाग नियंञक,पुणे एसटी विभाग अधिकारी अरुण सिया यांनी केले आहे. तसेच एसटी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिट तपासणी आता नियमीत केली जाणार असून त्यात बदल केले जाणार असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे यांनी दिली. त्यामुळे सर्व प्रवाशांनी एसटी विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांच्यावतीने करण्यात आले. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने पाऊल उचल्याची माहिती एसटी महामंडळ आधिकाऱ्यांनी दिली. तसेच प्रताप सरनाईक सविस्तर श्वेतपत्रिका काढणार आहेत. त्यात एसटी महामंडळाला किती फायदा आणि नुकसान झाले याची माहिती असणार आहे.


Comments
Add Comment

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून

जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी