जिल्ह्यात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात

सहा हजार हेक्टरवर भातपेरणी, जिल्ह्यात ८९ हजार हेक्टरवर होणार भाताची लागवड


अलिबाग  : पावसाळ्याला यंदा मे महिन्यापासून सुरुवात झाली खरी; परंतु जून महिन्यातच खऱ्या अर्थाने खरिपाच्या हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. जिल्ह्यात यावर्षी खरिपात ८९ हजार १६८ हेक्टरवर भाताची लागवड होणार असून, आतापर्यंत जिल्ह्यात ६ हजार १३५ हेक्टरवर भात पीक बियाण्याची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात काही भागात जूनच्या सुरुवातीच्या काळात पेरण्या झालेल्या शेतीमध्ये आता लावणीची कामेही सुरू झाली आहेत.


यावर्षी जवळजवळ एक महिना आधीच मे महिन्यात पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या पीक नियोजनावर परिणाम झाला. मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. पाऊस पुन्हा जूनमध्ये विश्रांती घेण्याची भीती शेतकऱ्यांना होती. जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरणीच्या कामांना वेग येत असतो. त्यानंतर पावसाचे प्रमाण वाढून पेरलेले बियाणे चांगल्याप्रकारे तयार होते. दरवर्षीच्या या वेळापत्रकात क्वचित फरक पडतो.


मात्र यावर्षी पावसाने जवळजवळ एक महिना आधीपासून सुरुवात केल्याने शेतकरी संभ्रमात पडले होते. रायगड जिल्ह्यात यावर्षी अलिबाग तालुक्यातील १११५७ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार आहे. तालुक्यात सध्या ८९० हेक्टर भात बियाण्याची पेरणी झाली आहे. पनवेलमध्ये ७९२७ हेक्टरवर भात लागवड होणार असून, सध्या २८० हेक्टरवर पेरणी झाली आहे. कर्जतमध्ये ९०२४ हेक्टरवर लागवड होणार असून, ६७५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


खालापुरात २७१३ हेक्टरवर भात लागवड होणार असून, १२७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उरणमध्ये २३०९ हेक्टरवर लागवड होणार असून, १७३ हेक्टरवर भात पेरणी झाली आहे. सुधागडात २८१६ हेक्टरवर भात लागवड होणार असून, २५४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


पेण तालुक्यातील ११६०४ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ९६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. महाड तालुक्यातील ९०५० हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ८५१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. माणगाव तालुक्यातील ११७९५ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, सध्या ५१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. रोह्यात ९१९१ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ५९१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.


पोलादपुरात ३२३५ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, २४९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. मुरुडमध्ये ३३०० हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ३०३ हेक्टरवर पेरणी झाली आहे. श्रीवर्धनमध्ये १४०३ हेक्टरवर लागवड होणार असून, १०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हसळामध्ये २११७ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, १२९ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तळा तालुक्यात १५२१ हेक्टरवर भात पिकाची लागवड होणार असून, ३४ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Comments
Add Comment

Heavy Rain In Palghar : घोणसई गावाला पाण्याचा वेढा; मुख्य पूल पाण्याखाली

- मुख्य पूल बुडाल्याने गावाचा बाहेरील संपर्क खंडित वाडा : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार

Vasai-Virar Rain Update : वसई-विरारमध्ये पावसाचा कहर! पूर, वीज आणि इंटरनेट बंद; हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

पालघर : वसई-विरार (Vasai- Virar) परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सलग दोन

Vandri Dam Waterfall : धबधब्यावर जाताय? थांबा! पालघरच्या वांद्री धबधब्यावर घडला थरार

धबधब्यांवर पाणी अचानक वाढलं आणि पर्यटकांची उडाली तारांबळ पालघर : मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर

Girish Mahajan : पालघर पूरस्थितीवर सरकार ॲक्शन मोडमध्ये; गिरीश महाजनांचा दौरा, अभ्यासगटाची घोषणा

पालघर : मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पालघर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती (Flood Situation) निर्माण झाली असून जनजीवन (Normal

Vasai Rain : मुसळधार पावसाचा फटका! वसईत इमारतीचा सज्जा कोसळला, रस्ते जलमय

वसई : मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असतानाच वसई (Vasai) परिसरात इमारतींशी संबंधित दुर्घटनांची (Building Accidents) मालिका सुरूच आहे.

Rain Update : गुरुवारी या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ! २४ तासांसाठी रेट अलर्ट

Mumbai : आज सकाळपासून मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, रायगड आणि पालघर