सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे. सिंधुदुर्ग हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.


या जिल्ह्यातील पासपोर्ट अर्जदारांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत आहे. जवळील पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशांचे मोठे नुकसान होते. जनतेला विलंब आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ची तातडीची गरज आहे. असे निवेदनात म्हटले आहे.


नागरिकांच्या दृष्टीने जे हिताचे आहे, जे गरजेचे आहे. त्याला आमदार निलेश राणे तत्काळ प्राधान्य देऊन कार्यवाही पूर्ण करतात. प्रश्न मार्गी लावतात. विकासकामात मतदारसंघ गतिमान वाटचाल करत असून नागरिकांच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यतत्परतेतून दिसून येत आहे.

Comments
Add Comment

वारकरी संप्रदायाचा सर्वोच्च बहुमान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'संत एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार' जाहीर

पैठण : वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा आणि पैठण येथील श्री संत एकनाथ महाराज संस्थानकडून

लोणार सरोवराबाबत चिंतेची बाब; सरोवरात वाढतेय पाण्याची पातळी

बुलढाणा: पर्यटक आणि शास्त्रज्ञांचे आकर्षण केंद्र असलेल्या महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील

नागपूर महापालिका निवडणूक: १५१ जागांसाठी प्रशासन सज्ज, दुबार मतदारांवर विशेष नजर

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मनपा आयुक्त अभिजित चौधरी

विद्यार्थ्यांचा अनादर केल्यास शिक्षकांवर होणार कठोर कारवाई

शिक्षण विभागाकडून कठोर नियमावली; सुरक्षेत कसूर झाल्यास शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक जबाबदार मुंबई :

धक्कादायक! कर्ज फिटवण्यासाठी केला मृत्यूचा बनाव; एक मेसेज आणि सत्याचा उलगडा

लातूर: फायनान्स कंपनीत काम करणाऱ्या गणेश चव्हाण नावाच्या तरुणाने आपल्याच मृत्यूचा बनाव केल्याची धक्कादायक

अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात! तिघांचा जागीच मृत्यू

बीड: अंबेजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर स्कॉर्पिओ आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ३ जणांचा जागीच