सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे. सिंधुदुर्ग हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.


या जिल्ह्यातील पासपोर्ट अर्जदारांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत आहे. जवळील पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशांचे मोठे नुकसान होते. जनतेला विलंब आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ची तातडीची गरज आहे. असे निवेदनात म्हटले आहे.


नागरिकांच्या दृष्टीने जे हिताचे आहे, जे गरजेचे आहे. त्याला आमदार निलेश राणे तत्काळ प्राधान्य देऊन कार्यवाही पूर्ण करतात. प्रश्न मार्गी लावतात. विकासकामात मतदारसंघ गतिमान वाटचाल करत असून नागरिकांच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यतत्परतेतून दिसून येत आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे