सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे, परराष्ट्र मंत्र्यांकडे आ. निलेश राणे यांची मागणी

  28

मालवण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करावे. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे निवेदन पत्राच्या माध्यमातून केली आहे. सिंधुदुर्ग हा एक सीमावर्ती जिल्हा आहे आणि एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे.


या जिल्ह्यातील पासपोर्ट अर्जदारांची संख्या दरवर्षी सातत्याने वाढत आहे. जवळील पासपोर्ट सेवा केंद्र नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासामुळे वेळ आणि पैशांचे मोठे नुकसान होते. जनतेला विलंब आणि त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे आपल्या जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र ची तातडीची गरज आहे. असे निवेदनात म्हटले आहे.


नागरिकांच्या दृष्टीने जे हिताचे आहे, जे गरजेचे आहे. त्याला आमदार निलेश राणे तत्काळ प्राधान्य देऊन कार्यवाही पूर्ण करतात. प्रश्न मार्गी लावतात. विकासकामात मतदारसंघ गतिमान वाटचाल करत असून नागरिकांच्या दृष्टीने अधिकाधिक सेवा सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांच्या कार्यतत्परतेतून दिसून येत आहे.

Comments
Add Comment

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार

पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी, रोहिणी खडसेंनी घेतली शरद पवारांची भेट

पुणे : पुण्यातील खराडी परिसरातल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. घटनास्थळावरुन अमली पदार्थ जप्त केले. या

‘महादेवी हत्तिणी’च्या ‘नांदणी’वापसीचा मार्ग मोकळा, पण कायद्याचा अडसर

कोल्हापूर : संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या महादेवी हत्तिणीला जनभावनांचा आदर करत ‘वनतारा’