पालिकेची २ हजार ७०० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर

  42

भाईंदर :माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली २ हजार ७०० कोटी रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून त्यातील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीत व्यक्त केला. बैठकीला मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, एमएमआरडीसीचे अतिरिक्त आयुक्त, सूर्या प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता व इतर अधिकारी
उपस्थित होते.


सरनाईक पुढे म्हणाले की, महायुतीच्या कालखंडात एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे राज्यातील एकमेव उदाहरण असेल, मंजूर निधीतील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल तर उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले त्यात महापालिका भूखंड अतिक्रमणमुक्त करणे, स्तनदा माता, लहान मुले यांना सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या प्रत्येक उद्यानात एक हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमीची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. तसेच या बैठकीत सुर्या पाणीपुरवठा योजना, जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न, अग्निशामक दलाची भरती प्रक्रिया या प्रकल्पांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला.

Comments
Add Comment

ठाणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर, नगरसेवक संख्येत वाढ नाहीच, यंदाही 131 नगसेवक

मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून आज ठाणे महानगरपालिकेची

Bhiwandi Accident : भिवंडीत खड्ड्यांनी घेतला डॉक्टरचा बळी; आतापर्यंत जीवघेण्या खड्ड्यामुळे तिघांचे प्राण गेले, जबाबदार कोण?

भिवंडी : भिवंडी शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे. वंजारपट्टी नाका परिसरात उघडखाबड

ठाण्यात मुसळधार पावसामुळे गणपती कारखान्यात शिरलं पाणी

ठाण्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असताना पावसाचा फटका गणपती मूर्तीला देखील बसला

पावसामुळे ठाण्यात ४ महिन्यांत २० जणांचा बळी!

ठाणे: गेल्या चार महिन्यांत ठाणे जिल्ह्यात पावसामुळे संबंधित घटनांमध्ये किमान २० लोकांचा मृत्यू झाला आहे, तर या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुरू केले ‘लाडकी सून’ अभियान

ठाणे: 'लाडकी बहीण' योजनेच्या यशामुळे उत्साहित होऊन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी

भिवंडीत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी आला स्पायडरमॅन !

ठाणे : भिवंडीत भाजी मार्केटमध्ये साचलेले पाणी काढण्यासाठी चक्क स्पायडरमॅन आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर