पालिकेची २ हजार ७०० कोटींची विकासकामे प्रगतिपथावर

भाईंदर :माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिलेली २ हजार ७०० कोटी रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून त्यातील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विकास कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका मुख्यालयात बोलवलेल्या बैठकीत व्यक्त केला. बैठकीला मीरा भाईंदर महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, एमएमआरडीसीचे अतिरिक्त आयुक्त, सूर्या प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता व इतर अधिकारी
उपस्थित होते.


सरनाईक पुढे म्हणाले की, महायुतीच्या कालखंडात एकनाथ शिंदे यांनी मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रासाठी सर्वाधिक निधी दिल्याचे राज्यातील एकमेव उदाहरण असेल, मंजूर निधीतील अर्ध्या कामांचे लोकार्पण येत्या चार महिन्यात होईल तर उर्वरित कामे वेळेत पूर्ण करण्याचा मानस आहे.


परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्तांना निर्देश दिले त्यात महापालिका भूखंड अतिक्रमणमुक्त करणे, स्तनदा माता, लहान मुले यांना सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या प्रत्येक उद्यानात एक हिरकणी कक्ष उभारण्यात यावा, पाळीव प्राण्यांची स्मशानभूमीची निर्मिती करणे यांचा समावेश आहे. तसेच या बैठकीत सुर्या पाणीपुरवठा योजना, जुन्या धोकादायक इमारतींचा प्रश्न, दिव्यांगांचे प्रश्न, अग्निशामक दलाची भरती प्रक्रिया या प्रकल्पांचा आढावा मंत्री सरनाईक यांनी घेतला.

Comments
Add Comment

मुरबाडमधील शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस जमा होण्यास सुरुवात

मुरबाड : मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाने सन २०२४-२५ या हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांची भातविक्रीसाठी ऑनलाईन

कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपमध्ये प्रवेश

उल्हासनगरात उबाठा सेनेला धक्का उल्हासनगर : उल्हासनगरमधील उबाठा गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून कल्याण

ठाण्यात महाविकास आघाडीची ‘बिघाडी’?

महाविकास आघाडीच्या नेत्यांची मोट बांधण्यास सुरुवात काँग्रेसच्या ३५ जागा वाटपाच्या मागणीने अधिक तिढा

नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड  नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन

नवी मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेत ‘कांटे की टक्कर’

दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी ५४ माजी नगरसेवकांचे संख्याबळ नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या

मीरा भाईंदरच्या मच्छीमारांच्या सर्व समस्या सोडवणार, मंत्री नितेश राणेंचे आश्वासन

भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील उत्तन परिसरातील मच्छीमारांवर होत असलेला अन्याय दूर करून त्यांच्या सर्व समस्या