Tata Hospital : भारतात टाटा रुग्णालयामध्ये प्रथमच एमआयबीजी पद्धतीचा वापर, न्यूरोब्लास्टोमा रुग्णाचा जीव वाचला...

  61


मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून न्यूरोब्लास्टोमा (Neuroblastoma) कर्करोगाच्या रुग्णांमध्ये वाढ होतं आहे. यापूर्वी अनेक रुग्णांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.  मुंबईतील प्रसिद्ध असलेले टाटा रुग्णालयात १७ वर्षाच्या मुलाला न्यूरोब्लास्टोमा कर्करोग (Neuroblastoma cancer) आजाराने ग्रासलेले होते. त्यामुळे टाटा रुग्णालयात गेले अनेक महिन्यांपासून रुग्ण उपचार घेत होता. त्यामुळे टाटा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाला एमआयबीजी इंजेक्शन देऊन मुलाचे प्राण वाचवून नवीन आयुष्य दिले. अशा प्रकारचे एमआयबीजी इंजेक्शनचा वापर करुन रुग्णांवर उपचार करण्याची हि पहिलीच घटना आहे.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांवर केमोथेरपी, (Chemotherapy) शस्त्रक्रिया, ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण, रेडिओथेरपी, ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपी आणि डिफरेंशीएशन उपचार केले जातात.  अशा रुग्णांवर ॲण्टी जीडी २ इम्युनोथेरपीचा वापर करुन उपचार केले जातात. परंतू हि उपचार पद्धती खुपच खर्चीक असल्याने ती रुग्णांना परवडत नाही. त्यामुळे न्यूरोब्लास्टोमा कर्करेाग असलेल्या रुग्णांवर एमआयबीजी पद्धतीने उपचार केले जातात.


न्यूरोब्लास्टोमा आजार असलेल्या रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शन (MIBG injection) दिल्यानंतर गॅमा किरण उत्सर्जित होतात. या रेडिएशनच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीवर त्याचा परिणाम देखील होतो. त्यामुळे योग्य काळजी घेणे आवश्यक असते. एमआयबीजी इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर रुग्णांना विशेष विलगीकरण कक्षात ठेवले जाते.  भारतात एमआयबीजी इंजेक्शनचा वापर ३०० मिलीक्युरीज मध्ये वापरण्याची परवानगी आहे. परंतू इंजेक्शनाची उच्च मात्रात वापर करुन रुग्णांवर उपचार केले जातात, त्यामुळे रुग्णही बरे झाल्याचे आढळून आले आहेत.


भारतामध्येही न्यरोब्लास्टोमा रुग्णांना एमआयबीजी इंजेक्शनची उच्च मात्रा देण्याचा निर्णय टाटा रुग्णालयाने (Tata Hospital) घेतला. न्यूरोब्लास्टोमा झालेल्या १७ वर्षीय रुग्णाला ५ मे रोजी ४०० मिलिक्युरीज मात्रा असलेली दोन एमआयबीजीची इंजेक्शन देण्यात आली. त्यानंतर त्याला विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. त्यानंतर पाच दिवसांनी रुग्णाला रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. डॉक्टरांच्या अपेक्षेनुसार इंजेक्शन दिल्यानंतर २१ दिवसांनी त्याच्या शरीरातील स्टेम सेल्स कमी झाल्याने २४ व्या दिवशी त्याला ऑटोलॉगस हेमॅटोपोएटिक स्टेम सेल्स देण्यात आले. त्यानंतर मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे टाटा रुग्णालयाचे संचालक डॉक्टर सुदीप गुप्ता यांनी भारतामध्ये एमआयबीजी इंजेक्शनाची पद्धत यशस्वी झाली आहे. असे सांगितले



Comments
Add Comment

नारळी पौर्णिमा आणि ज्येष्ठागौरी विसर्जन दिवशी मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालयांना स्थानिक सुटी

मुंबई : सन २०२५ या वर्षातील गोपाळकाला (दहीहंडी) व अनंत चतुर्दशी या ऐवजी नारळी पौर्णिमा व ज्येष्ठागौरी विसर्जन

बलात्काराची खोटी तक्रार दाखल करुन १ कोटींची खंडणी वसूल केल्याप्रकरणी माजी बँक कर्मचारी गजाआड!

मुंबई : मुंबईतील चारकोप पोलिसांनी माजी बँक कर्मचारी डॉली कोटकला अटक केली आहे. तिच्यावर आपल्या माजी प्रियकरावर, जो

डॉक्टरांपेक्षा एक रुपया अधिक पगार पाहिजे; आत्मसन्मानासाठी मुंबईचे 'सफाई कर्मचारी' सरसावले!

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले मनपाचे सफाई कर्मचारी आता केवळ झाडू न मारता,

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा