जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर


मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील ‘जिओ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे हे त्यांच्या कारकिर्दीतील “सर्वात मोठे धाडस” होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. त्या काळात भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. तसेच अनेक विश्लेषकांना या योजनेच्या यशाबाबत शंका होती, असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.


“जिओमध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देऊ शकली नसती, तरीसुद्धा ती भारताच्या डिजिटायझेशनच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरली असती,” असेही अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार सोपे नव्हते. “त्या काळात आम्ही आमच्याच पैशाने गुंतवणूक करत होतो आणि मी स्वतः प्रमुख शेअरहोल्डर होतो. आम्ही मोठे धोके पत्करले कारण आमच्यासाठी ‘स्केल’ महत्वाचा होता आणि आमची ध्येयंही खूप मोठी होती., असे म्हणाले.


५ जी तंत्रज्ञानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “जिओचे ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस म्हणजेच आमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केले आहे. कोअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सर्व घटक आम्ही स्वतः तयार केले. फक्त २० टक्के भागात आम्ही एरिक्सन आणि नोकिया यांना सामावून घेतले, जेणेकरून आमची प्रणाली जागतिक निकषांवर खरी ठरेल.


मी माझ्या टीमला सांगितले, ‘तुम्हाला यांच्यापेक्षा चांगले बनवायचे आहे.’ आणि त्यांनी ते करून दाखवले. आज आम्ही खरोखरच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत.”
भविष्यातील योजना सांगताना अंबानी म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो आहे की आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे मालक व्हायला हवे, इनोव्हेटर व्हायला हवे. रिलायन्स आज एका डीप-टेक आणि प्रगत उत्पादन कंपनीकडे वाटचाल करत आहे. दूरसंचार क्षेत्रातून आम्ही याची सुरुवात केली आहे.”

Comments
Add Comment

Pune Nasrapur Girl Murder Case : नसरापूर प्रकरणातील मोठी अपडेट! १५ दिवसांत ११०० पानांचं आरोपपत्र, नराधमाला फाशीची शक्यता वाढली

पुणे : महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणात आता

Blinkit News : ऑनलाईन फूड डिलिव्हरीचा धक्कादायक प्रकार; एक्स्पायर मटकी पोहोचल्याने संताप

अकोला : ऑनलाईन फूड डिलिव्हरीच्या वाढत्या वापरामुळे ग्राहकांना घरबसल्या सुविधा मिळत असल्या, तरी याच सेवांच्या

Operation Antim Prahaar अंतर्गत ८ नक्षलवाद्यांना अटक, गडचिरोली जिल्हा अखेर नक्षलमुक्त

गडचिरोली : नक्षलवादी चळवळीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी राबविलेल्या 'ऑपरेशन अंतिम प्रहार' या

Kolhapur Sucide Case : पत्नी आणि दोन मुलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही; पुईखडी घाटात विराट गौतम यांची आत्महत्या

कोल्हापूर : कोल्हापुरातील एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हळहळून गेलं आहे. पत्नी आणि दोन मुलांना अपघातात

Teachers : निवडणुकीसह विविध कार्यालयांमध्ये प्रतिनियुक्तीवर गेलेल्या शिक्षकांना पुन्हा वर्गावर धाडणार

शिक्षण संचालनालयाद्वारे परिपत्रक केले जारी मुंबई : मुंबईसह राज्यातील काही भागांमधील शिक्षक हे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा