जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर


मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील ‘जिओ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे हे त्यांच्या कारकिर्दीतील “सर्वात मोठे धाडस” होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. त्या काळात भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. तसेच अनेक विश्लेषकांना या योजनेच्या यशाबाबत शंका होती, असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.


“जिओमध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देऊ शकली नसती, तरीसुद्धा ती भारताच्या डिजिटायझेशनच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरली असती,” असेही अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार सोपे नव्हते. “त्या काळात आम्ही आमच्याच पैशाने गुंतवणूक करत होतो आणि मी स्वतः प्रमुख शेअरहोल्डर होतो. आम्ही मोठे धोके पत्करले कारण आमच्यासाठी ‘स्केल’ महत्वाचा होता आणि आमची ध्येयंही खूप मोठी होती., असे म्हणाले.


५ जी तंत्रज्ञानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “जिओचे ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस म्हणजेच आमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केले आहे. कोअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सर्व घटक आम्ही स्वतः तयार केले. फक्त २० टक्के भागात आम्ही एरिक्सन आणि नोकिया यांना सामावून घेतले, जेणेकरून आमची प्रणाली जागतिक निकषांवर खरी ठरेल.


मी माझ्या टीमला सांगितले, ‘तुम्हाला यांच्यापेक्षा चांगले बनवायचे आहे.’ आणि त्यांनी ते करून दाखवले. आज आम्ही खरोखरच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत.”
भविष्यातील योजना सांगताना अंबानी म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो आहे की आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे मालक व्हायला हवे, इनोव्हेटर व्हायला हवे. रिलायन्स आज एका डीप-टेक आणि प्रगत उत्पादन कंपनीकडे वाटचाल करत आहे. दूरसंचार क्षेत्रातून आम्ही याची सुरुवात केली आहे.”

Comments
Add Comment

Satara Murder: कराडमध्ये शासकीय अभियंत्याची हत्या; सुपारी देऊन रचला कट, जवळच्या नातेवाईकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड (Karad) शहरात एका शासकीय अभियंत्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. या

MPSC EXAM : MPSC परीक्षार्थींसाठी महत्त्वाचे! आता परीक्षा केंद्रावर दीड तास आधी पोहोचणे अनिवार्य; नवीन नियमावली जाहीर

NAGPUR: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या शिस्तपालनासाठी आयोगाने कडक पावले उचलली

 Solapur Crime News: धक्कादायक! सोलापुरात 5 वर्षीय पुतण्याची काकाकडून हत्या, आरोपीवर गुन्हा दाखल

सोलापूर: सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील वरूर गावात एक मन सुन्न

Nagpur Conversion Case : नागपूरच्या दर्ग्यात महिलेचा विनयभंग आणि धर्मांतरासाठी सक्ती; ६ जणांवर गुन्हा

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील एका दर्ग्यात घडलेल्या कथित सक्तीच्या धर्मांतराच्या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली

MSME : MSME उद्योजकांसाठी मोफत हेल्पलाईन सुरू; एका कॉलवर मिळणार तज्ज्ञ मार्गदर्शन

मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक मार्गदर्शन, माहिती आणि तज्ज्ञ

Mumbai Crime : मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये संतापजनक प्रकार, तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकास अटक

मुंबईतून (Mumbai) एक संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबई लोकल ट्रेनमधून प्रवास करताना एका तरुणीचा विनयभंग (Molestation)