जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर


मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील ‘जिओ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे हे त्यांच्या कारकिर्दीतील “सर्वात मोठे धाडस” होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. त्या काळात भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. तसेच अनेक विश्लेषकांना या योजनेच्या यशाबाबत शंका होती, असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.


“जिओमध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देऊ शकली नसती, तरीसुद्धा ती भारताच्या डिजिटायझेशनच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरली असती,” असेही अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार सोपे नव्हते. “त्या काळात आम्ही आमच्याच पैशाने गुंतवणूक करत होतो आणि मी स्वतः प्रमुख शेअरहोल्डर होतो. आम्ही मोठे धोके पत्करले कारण आमच्यासाठी ‘स्केल’ महत्वाचा होता आणि आमची ध्येयंही खूप मोठी होती., असे म्हणाले.


५ जी तंत्रज्ञानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “जिओचे ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस म्हणजेच आमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केले आहे. कोअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सर्व घटक आम्ही स्वतः तयार केले. फक्त २० टक्के भागात आम्ही एरिक्सन आणि नोकिया यांना सामावून घेतले, जेणेकरून आमची प्रणाली जागतिक निकषांवर खरी ठरेल.


मी माझ्या टीमला सांगितले, ‘तुम्हाला यांच्यापेक्षा चांगले बनवायचे आहे.’ आणि त्यांनी ते करून दाखवले. आज आम्ही खरोखरच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत.”
भविष्यातील योजना सांगताना अंबानी म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो आहे की आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे मालक व्हायला हवे, इनोव्हेटर व्हायला हवे. रिलायन्स आज एका डीप-टेक आणि प्रगत उत्पादन कंपनीकडे वाटचाल करत आहे. दूरसंचार क्षेत्रातून आम्ही याची सुरुवात केली आहे.”

Comments
Add Comment

Nanded Crime : टोळीयुद्धाने नांदेड शहर हादरले; एकाचा थेट रुग्णालयात घुसून खून

नांदेड शहरात शनिवारी (४ एप्रिल) मध्यरात्री पुन्हा एकदा टोळीयुद्धाचा भडका उडाला. येथील कुख्यात साईलाला आणि सदा

Ashok Kharat Case : भोंदूबाबा अशोक खरातची ईडी चौकशी होणार - मुख्यमंत्री फडणवीस

सध्या राज्यासह देशात चर्चेत असलेल्या नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचा पर्दाफाश

U-17 National Boxing Championship : गडकरींच्या हस्ते बॉक्सिंग स्पर्धेचा दमदार शुभारंभ!

- स्टेजवरूनच दिला जोशाचा पंच… नागपूरमध्ये बॉक्सिंगचा थरार रंगात! - ग्लोव्हज हातात… स्टेजवरून दिला जोशपूर्ण

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित जपण्यासाठी परीक्षा आणि निकाल प्रक्रिया आता 'मिशन मोड'वर!

उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे बाटु विद्यापीठ प्रशासनाला कडक

Ratnagiri : संकष्टी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक फुलांची सजावट; भाविकांची मोठी गर्दी

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त अत्यंत देखणी आणि मनमोहक

Nashik: 'कुंभमेळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा महोत्सव'

नाशिक: आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्या संदर्भात नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला मंत्री छगन भुजबळ