जिओमध्ये गुंतवणूक ही माझ्या आयुष्यातली मोठी रिस्क : मुकेश अंबानी

रिलायन्स आता डीप-टेक, अ‍ॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग कंपनी बनण्याच्या मार्गावर


मुंबई  : टेलिकॉम क्षेत्रातील ‘जिओ’मध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणे हे त्यांच्या कारकिर्दीतील “सर्वात मोठे धाडस” होते, असे मत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी व्यक्त केले. त्या काळात भारत इतक्या प्रगत डिजिटल तंत्रज्ञानासाठी तयार नाही. तसेच अनेक विश्लेषकांना या योजनेच्या यशाबाबत शंका होती, असेही त्यांनी मुलाखतीत स्पष्ट केले.


“जिओमध्ये केलेली गुंतवणूक अपेक्षित परतावा देऊ शकली नसती, तरीसुद्धा ती भारताच्या डिजिटायझेशनच्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल ठरली असती,” असेही अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स जिओमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेणे फार सोपे नव्हते. “त्या काळात आम्ही आमच्याच पैशाने गुंतवणूक करत होतो आणि मी स्वतः प्रमुख शेअरहोल्डर होतो. आम्ही मोठे धोके पत्करले कारण आमच्यासाठी ‘स्केल’ महत्वाचा होता आणि आमची ध्येयंही खूप मोठी होती., असे म्हणाले.


५ जी तंत्रज्ञानाबाबत बोलताना अंबानी म्हणाले, “जिओचे ५जी तंत्रज्ञान पूर्णपणे इन-हाउस म्हणजेच आमच्या स्वतःच्या प्रयत्नांतून विकसित केले आहे. कोअर, हार्डवेअर, सॉफ्टवेअर सर्व घटक आम्ही स्वतः तयार केले. फक्त २० टक्के भागात आम्ही एरिक्सन आणि नोकिया यांना सामावून घेतले, जेणेकरून आमची प्रणाली जागतिक निकषांवर खरी ठरेल.


मी माझ्या टीमला सांगितले, ‘तुम्हाला यांच्यापेक्षा चांगले बनवायचे आहे.’ आणि त्यांनी ते करून दाखवले. आज आम्ही खरोखरच त्यांच्यापेक्षा पुढे आहोत.”
भविष्यातील योजना सांगताना अंबानी म्हणाले, “मी नेहमी म्हणत आलो आहे की आपल्याला केवळ तंत्रज्ञानाचे वापरकर्ते न राहता त्याचे मालक व्हायला हवे, इनोव्हेटर व्हायला हवे. रिलायन्स आज एका डीप-टेक आणि प्रगत उत्पादन कंपनीकडे वाटचाल करत आहे. दूरसंचार क्षेत्रातून आम्ही याची सुरुवात केली आहे.”

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे