अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

  16

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात


मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेला व पी. डि'मेलो मार्गाला जोडणारा कर्नाक उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या पुलाचे लोकार्पण करण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक असलेली रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्रही (एनओसी) प्राप्त झाली आहे. या पुलाच्या बांधकामावर शेवटचा हात प्रशासनाच्या वतीने फिरवण्यात आला आहे. त्यामुळे अखेर रेल्वेची एनओसी प्राप्त झाल्याने आता तरी वेळेत हे पूल वाहतुकीसाठी खुले होईल का असा सवाल उपस्थित केला जात आहे. दक्षिण मुंबईतील मशीद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे.


लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे.या पुलाचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. या पुलाचे बांधकाम प्रथम मे महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित होते, त्यानंतर ही कामे १० जूनपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानुसार ही कामे पूर्ण झाल्यानंतरही लोकार्पणाच्या दृष्टिकोनातून रेल्वेचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असते. त्यानुसार महापालिकेच्या पूल विभागाच्या वतीने रेल्वेकडे एनओसीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता.


परंतु रेल्वेची एनओसी प्राप्त न झाल्याने या पुलाचे लोकार्पण लांबणीवर पडले होते. अखेर बुधवारी २५ जुन २०२५ रोजी संध्याकाळी या पुलासाठीची एनओसी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता पुलाच्या लोकार्पणाचा मार्ग खुला झाला असून विक्रोळीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही उद्घटनाशिवाय या पुलाचे लोकार्पण करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला देता की यासाठीची वेळ देत स्वत: उद्घाटन करता याकडे सर्वाचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

Hide Tide Alert: विक्रमी पावसानंतर मुंबईत भरतीचा इशारा, मुंबईच्या चौपाट्यांवर न जाण्याचे आवाहन

आज समुद्र खवळणार मुंबईत हाय टाइड अलर्ट जारी जूनच्या अखेरीस मुसळधार पावसाची शक्यता असल्याने भारतीय हवामान

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या

भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात